Bhadgaon Two Children Drowned : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन्हीही मुलं चार वर्षीय होते.
आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश
पुराच्या पाण्यामुळे शाळेच्या परिसराला संरक्षण देणारी भिंत कोसळलेली होती. याच नाल्याजवळ विद्यार्थ्यांचा बाथरूम असल्याने तेथे गेलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा पाय घसरून नाल्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर दोघांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर पालकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला असून शाळा प्रशासनाच्या भोंगळ व दुर्लक्षित कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Satara Accident : भरधाव वाहनांची समोरासमोर जोरदार धडक, भीषण अपघातात वाहन दुभाजकावर आदळलं, एकाचा मृत्यू; 7 जण गंभीर
बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे दि. 12 डिसेंबर शुक्रवारी रोजी शाळेतून घरी येताना रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह अखेर गावाशेजारील एका विहिरीत तब्बल चार दिवसांनी आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धनश्री ही जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी रोजी सकाळी 10 वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी न परतल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.
Ahilyanagar Crime : नवरा अन् लेक बाहेरगावी, घरात घुसून एकट्या अपंग महिलेला संपवलं; अहिल्यानगरमधील ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा
ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे 4.55 वाजेच्या ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली होती. त्यानंतर गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे दप्तर आढळून आल्यानं अपहरणाचा संशय बळावला होता. दरम्यान, आज गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जळगाव एलसीबीचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल असून, मृत्यूचं नेमकं कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा सखोल तपास एलसीबी व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 60 ते 70 तासांहून अधिक काळ चाललेल्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट झाल्यानं कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
