Jalgaon Accident News : शहरात अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. महिनाभरात लग्न असलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. एका लग्नावरुन परत घरी येताना दुर्घटना घडली आणि माय-लेकीचा अंत झाला. एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यू कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मृत तरुणी निकिता निंबाळकरचं कुटुंब भुसावळ येथे लग्न समारंभ आटोपून जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे घरी परतत होते. एकाच पॅगो रिक्षात 8 ते 10 प्रवासी होते. गारखेडाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात निकिता निंबाळकर (वय 20), तिची आई सरला गोपाळ निंबाळकर (42) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (वय 32) तळेगाव या तिघांचा अपघातात मृत्यू झाला.
Beed News : लग्न लावण्यासाठी 10 लाख दिले, पण 3 महिन्यात वधूचा प्रताप; बीडमध्ये 7 जणांवर गुन्हा, प्रकरण हैराण करणारं
जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरात सिमेंट मिक्सर ट्रक आणि पॅगो रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. सिमेंट मिक्सरने पॅगो रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
निकिता निंबाळकर या तरुणीचा एक महिन्यापूर्वीच साखरपुडा झाला होती. सुखी संसाराचा वेल भरण्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला. लग्नाचं स्वप्न ती बघत होती. एक महिन्यानंतर लग्न होणार होतं. मात्र त्याआधीच अनर्थ घडला. भुसावळवरून नातेवाईकांचं लग्न आटपून येत असताना मोठा अपघात झाला, या अपघातात ही तरुणी जागीच ठार झाली, तर तिच्या आईचा देखील यात मृत्यू झाला आहे.
मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने अपघात, जीवितहानी नाही; पण प्रवासी गाड्या अडकल्या!
लग्न जवळ आल्याने निंबाळकर कुटुंबात लग्नातची तयारी सुरू होती. तर दुसरीकडे निकिताची देखील लग्नाची खरेदी सुरू होती. अवघ्या विसाव्या वर्षी तिचा अपघातात मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील लेक आणि आई यांचा मृत्यू झाल्याने निंबाळकर कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांनी लेकीच्या लग्नाची तयारी सुरू केली होती, मात्र दुर्दैवी घटनेने वडिलांना मुलीचा अंत्यविधीची करावा लागला.
अपघातात जयेश गोपाळ निंबाळकर (16), सरला गोपाळ निंबाळकर (39), योगेश विठ्ठल गायकवाड (45, चिंच), सुरेखा विलास कापडे (50, नांभाजी नगर), अखिलेश कुमार (50, उत्तर प्रदेश) आणि संगीता सुभाष चौधरी (50, संभाजीनगर) हे जखमी झाले आहेत.
