Pune Crime News : सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी सहज झाल्या आहेत. मात्र याचा दुष्परिणामही तितकाच आहे. पुण्यातील एका प्रकऱणावरून हे समोर आलं आहे. दोन अल्पवयीन तरूणींनी राजस्थान गाठलं, त्यानंतर काय घडलं? जाणून घ्या.
समाजमाध्यमातील ओळखी आणि अजाणतेपणे जुळलेल्या नात्यांमुळे अल्पवयीन मुलींचे पाऊल धोकादायक वळणावर जात असल्याचे उदाहरण काळेपडळमध्ये दिसून आले. या दोन्ही मुलींचा मागोवा घेण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी जवळपास साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करत चार दिवसांची शोधमोहीम राबवली. अखेर दोन्ही मुलींची सुरक्षित सुटका करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी राजस्थानमधील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१, रा. राणी, राजस्थान), सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजय हंचाटे आणि त्यांच्या पथकाने केली.
महसूल विभागाची पुण्यात मोठी कारवाई! 90 हजार ब्रासचा घोटाळा, महसूलमंत्र्यांनी थेट विधानसभेतच लावला 10 जणांचा निकाल; मोठा निर्णय जाहीर
दोन्ही मुली १५ आणि १६ वर्षांच्या असून एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी आहेत. यातील १५ वर्षीय मुलीचे इन्स्टाग्राम खाते होते. त्यातूनच तिची ओळख राजस्थानच्या सुरेशकुमार प्रजापती याच्याशी झाली. सुरेशकुमारने तिला थेट राजस्थानात येण्यास सांगितले. मुलगी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून १६ वर्षीय मैत्रिणीलाही घेऊन निघाली. राजस्थानला पोहोचल्यावर प्रजापतीने दुसऱ्या मुलीची ओळख त्याचा मित्र सुरेशकुमार राणाभील याच्याशी करून दिली.
पुण्यात मनसेच्या गोटात दिवसभरात मोठ्या घडामोडी, तर स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिस सक्रिय
दोन्ही मुली अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी काळेपडळ पोलिसांकडे तक्रार दिली. अल्पवयीन मुली असल्याने पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणात एक मुलगी राजस्थानमधील राणी गावात, तर दुसरी पाली जिल्ह्यात असल्याचे आढळले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने शोधमोहिम सुरू केली.
Pune Crime: ‘आई माझ्यासोबत….’; मुलाचं ऐकताचं हादरली माऊली, अल्पवयीन मुलावर पियानो क्लासमध्ये…
अल्पवयीन मुली घरातून नाहीशा झाल्याची तक्रार गांभीर्याने घेऊन तातडीने तपास सुरू केला. त्या वेळी मुली राजस्थानात गेल्याचे स्पष्ट झाले. राजस्थानात जाऊन चार दिवसांत मुलींचा शोध लावला, मुलींना सुखरूप आणले आणि आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपींकडे सखोल चौकशी केली जात आहे असं काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी म्हटलं आहे.
