• Sat. Jun 6th, 2026

    Pune Crime : अगं तु ये तर…! पुण्यातील जिवलग मैत्रिणींनी इन्स्टावरच्या प्रेमासाठी राजस्थान गाठलं, अन् पुढे… काय घडलं?

    Pune Crime : अगं तु ये तर…! पुण्यातील जिवलग मैत्रिणींनी इन्स्टावरच्या प्रेमासाठी राजस्थान गाठलं, अन् पुढे…  काय घडलं?

    Pune Crime News : सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी सहज झाल्या आहेत. मात्र याचा दुष्परिणामही तितकाच आहे. पुण्यातील एका प्रकऱणावरून हे समोर आलं आहे. दोन अल्पवयीन तरूणींनी राजस्थान गाठलं, त्यानंतर काय घडलं? जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे : ‘इन्स्टाग्रामवरील ओळख, सततच्या चॅटिंगमुळे वाढलेली मैत्री आणि त्यानंतर जुळलेले प्रेम,’ यातून पुण्यातील दोन अल्पवयीन मुली साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट राजस्थानात पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या मुलींना नुकतेच सुरक्षित माघारी आणण्यात आले असून, फूस लावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

    समाजमाध्यमातील ओळखी आणि अजाणतेपणे जुळलेल्या नात्यांमुळे अल्पवयीन मुलींचे पाऊल धोकादायक वळणावर जात असल्याचे उदाहरण काळेपडळमध्ये दिसून आले. या दोन्ही मुलींचा मागोवा घेण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी जवळपास साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करत चार दिवसांची शोधमोहीम राबवली. अखेर दोन्ही मुलींची सुरक्षित सुटका करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी राजस्थानमधील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१, रा. राणी, राजस्थान), सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजय हंचाटे आणि त्यांच्या पथकाने केली.
    Maharashtra Timesमहसूल विभागाची पुण्यात मोठी कारवाई! 90 हजार ब्रासचा घोटाळा, महसूलमंत्र्यांनी थेट विधानसभेतच लावला 10 जणांचा निकाल; मोठा निर्णय जाहीर
    दोन्ही मुली १५ आणि १६ वर्षांच्या असून एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी आहेत. यातील १५ वर्षीय मुलीचे इन्स्टाग्राम खाते होते. त्यातूनच तिची ओळख राजस्थानच्या सुरेशकुमार प्रजापती याच्याशी झाली. सुरेशकुमारने तिला थेट राजस्थानात येण्यास सांगितले. मुलगी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून १६ वर्षीय मैत्रिणीलाही घेऊन निघाली. राजस्थानला पोहोचल्यावर प्रजापतीने दुसऱ्या मुलीची ओळख त्याचा मित्र सुरेशकुमार राणाभील याच्याशी करून दिली.
    Maharashtra Timesपुण्यात मनसेच्या गोटात दिवसभरात मोठ्या घडामोडी, तर स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर

    कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिस सक्रिय

    दोन्ही मुली अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी काळेपडळ पोलिसांकडे तक्रार दिली. अल्पवयीन मुली असल्याने पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणात एक मुलगी राजस्थानमधील राणी गावात, तर दुसरी पाली जिल्ह्यात असल्याचे आढळले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने शोधमोहिम सुरू केली.
    Maharashtra TimesPune Crime: ‘आई माझ्यासोबत….’; मुलाचं ऐकताचं हादरली माऊली, अल्पवयीन मुलावर पियानो क्लासमध्ये…
    अल्पवयीन मुली घरातून नाहीशा झाल्याची तक्रार गांभीर्याने घेऊन तातडीने तपास सुरू केला. त्या वेळी मुली राजस्थानात गेल्याचे स्पष्ट झाले. राजस्थानात जाऊन चार दिवसांत मुलींचा शोध लावला, मुलींना सुखरूप आणले आणि आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपींकडे सखोल चौकशी केली जात आहे असं काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा