Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावर मानकोली-ठाणे पुलावर रस्त्याच्या दुरुस्तीमुळे कालपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, येत्या दोन दिवसांतही ही कोंडी कायम राहणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पब्लिक वर्क डिपार्टमेंट आणि डीएमसी हे एकत्र मिळून हे काम करीत आहेत. त्यांनी ओकट्रॉई नाका आणि नीरा सेंटर दरम्यान दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. हा महामार्गावरील एक महत्त्वाचा भाग असून येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे काम सुरू झाल्याबरोबरच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.
Thane News : घोडबंदर रोडवर शुक्रवारपासून वाहतूक बदल, पुन्हा कोंडीची शक्यता; कसे असतील पर्यायी मार्ग?
हे काम आणखी दोन दिवस सुरू राहणार असून, आजसह 13 आणि 14 डिसेंबरलाही नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी वाहनचालकांना अत्यंत आवश्यक नसल्यास भिवंडी बायपास टाळण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की विशेषतः जड आणि व्यावसायिक वाहनांसाठी डायव्हर्शन योजना आखण्यात आल्या आहेत.
पर्यायी मार्ग कोणते?
डीसीपी शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या कामामुळे मोठ्या आणि जड वाहनांच्या वाहतुकीत बदल करणे आवश्यक आहे. ठाण्याकडून येणारी वाहने माणकोली नाक्यापासून अंजूरफाटा, तिथून चिंचोटी मार्गावरून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वळवली जातील. त्याचबरोबर वाड्याकडून येणाऱ्या वाहनांना मनोर मार्गावर वळवले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी हे लक्षात घेऊन प्रवास करण्याचे अवाहान दिले आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी मोठे पक्ष असल्याने रिपब्लिकन पार्टीची चर्चा नाही; रामदास आठवलेंची खदखद?
गुरुवारी माणकोली आणि ठाणे पुलादरम्यान वाहतूक जवळजवळ ठप्प झाल्याने दुरुस्तीशी संबंधित अडथळ्यांमुळे गोंधळात आणखी भर पडली. ट्रेलर आणि कंटेनर ट्रकांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या, ज्यामुळे वाहतुकीचा प्रवाह अत्यंत मंदावला. गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात, जड वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे आणि चालू दुरुस्तीचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
