Washim Accident News : समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात साई भक्तांच्या कारला भीषण अपघात झाला. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या कारने मालवाहू पिकअपला दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 29 बीसी 2565 या क्रमांकाच्या कारसब यवतमाळ येथून 4 भक्त शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यांचा समृद्धी महामार्गावरील धनज बुद्रुक पोलिस स्टेशनच्या हद्दीतून प्रवास सुरू होता. त्यावेळी त्यांच्या वाहनासमोर धावणाऱ्या बोलेरो पीकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे भरधाव वेगात धावणारी कार अनियंत्रित होऊन पुढच्या पिकअपवर धडकून भीषण अपघात झाला.
Crime News : पहिल्या पत्नीचा मृत्यू, नंतर एजंटच्या माध्यमातून एक लाख देत दुसरीशी विवाह, पण वाटेत नको ते घडलं, कुटुंब हैराण
यात कार चालक मंगेश (पूर्ण नाव कळू शकले नाही) आणि विक्रम अशोकराव सौरगपते, वय ४०, रा. यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर नकूल मनोज यादव, वय ३५, रा. दत्त चौक यवतमाळ आणि मयूर दीपक डोनाडकर, वय 29, रा. दत्त चौक यवतमाळ, हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक गौरव ठाकरे यांनी अपघताचाची माहिती श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली असता त्यांनी रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळ गाठलं. सोबतच टोल प्लाजा कारंजा समृद्धी महामार्ग 108 रुग्णवाहिकेचे पायलट सोनू शिंदे, डॉ राठोड आणि शिवनी येथील 108 पायलट गोपाल रोहनकर या तिन्ही रुग्णवाहिका यांना तात्काळ घटनास्थळी बोलावून घेतल्या. सर्वांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघेजण जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी धनज पोलिसांनी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने अपघात, जीवितहानी नाही; पण प्रवासी गाड्या अडकल्या!
मालवाहूपिकअपपलटी
अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारने एका पिकअपला धडक दिली. जोरदार धडक दिल्याने समोरील मालवाहू पिकअप पलटी झाले. त्यातील साहित्याचे नुकसान झालं आहे. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झालं असून दोन साई भक्तांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
