Pune Marathi News : पुण्यातील ट्रॅव्हल एजन्सींना पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दिल्ली बॉम्बस्फोट आणि पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे नेमक्या सूचना काय आहेत? जाणून घ्या.
पहिल्यांदाच अशा प्रकारे ट्रॅव्हल एजन्सीसाठी पोलिसांनी नियमावली लागू केली आहे. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि दिल्ली येथे लाल किल्ल्याबाहेरील बॉम्बस्फोटाच्या पाश्र्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील ट्रॅव्हल एजन्सींसाठी खास सुरक्षा नियम आखून दिले आहेत. बुधवारी (१० डिसेंबर) यासंबंधी विश्रामबाग पोलिस ठाण्यात बैठक झाली.
पहलगाम हल्ल्यात 3 पाकिस्तानी दहशतवादी, तपासात हैराण करणारी माहिती उघड, सुरक्षा दलांनी अनेकांना घेतले ताब्यात
पोलिसांनी ग्राहक नोंदी, कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि CCTV व्यवस्थापन यावर विशेष लक्ष ठेवण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक ट्रॅव्हल एजन्सीचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पोलिस ठाण्यात नोंदवावा. एजन्सी चालवण्यासाठी संबंधित विभागाचे परवाने छायांकित सादर करणे. एजन्सीतील सर्व कर्मचाऱ्यांची पात्रता व पार्श्वभूमी तपासून छायांकित प्रत पोलिस ठाण्याला सादर करावी. संशयास्पद ग्राहक किंवा हालचाली दिसल्यास त्वरित पोलिस ठाण्याला संपर्क साधावा, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
Pune News: तिकडे अजित पवार दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला, इकडे बालेकिल्ल्यातच भाजपने दिला पहिला मोठा धक्का
काय आहेत सूचना ?
ट्रॅव्हल एजन्सी प्रत्येक ग्राहकाची नोंद ठेवतात. मात्र, काही जण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे ग्राहकांचे आधार, पॅन, मतदार कार्ड इत्यादी ओळखपत्रे तपासून नोंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडून येणारे पेमेंट पूर्णतः ऑनलाइन घेतले जावे; जेणेकरून बँक तपशिलांद्वारे आवश्यकतेनुसार तपास करता येऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि ६० दिवसांचा बॅकअप राखणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Pune News : संस्थेची गाडी कार्यालयासमोर लागली, सहकाऱ्यांच्या हातात उमेदवारी अर्ज, तानाजी सावंत यांच्या मुलाला हवी भाजपची उमेदवारी?
नियमावलीचा उद्देश पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि दहशतवादी घटनांचा संभाव्य धोका टाळणे हा आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकतात, त्या वेळी पुण्यातील पर्यटक सुखरूप आहेत का, याबाबत पोलिसांना तातडीने माहिती मिळत नाही. पर्यटकांची माहिती नोंद असल्यास संबंधित एजन्सी पोलिसांना तातडीने त्याबाबत कळवू शकते, असं विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद कसबे यांनी म्हटलं आहे.
