Abu Azmi on Arnav Khaire Death : अबू आजमी यांनी अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून हातात बॅनर घेऊन आंदोलन केले
अबू आजमी काय म्हणाले?
अबू आजमी आणि रईस शेख यांनी अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून हातात बॅनर घेऊन आंदोलन केले. सरकारवर टीका करताना अबू आजमी म्हणाले, ‘मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. रोजीरोटी कमवण्यासाठी लोक येथे येतात. जे येथे जन्मलेले नाहीत किंवा ज्यांचे शिक्षण येथे झाले नाही, त्यांना तुम्ही मराठी शिकवा. जर मराठी आवश्यक असेल तर ती प्रेमाने शिकवली पाहिजे. पण, भाषेच्या नावावर कोणाला मारणे, दुकान तोडणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.’
Bhavna Joshi : …तर माझा नवरा, तिघी बहिणी वाचल्या असत्या; भावना जोशींनी चूक सांगितली, माझे मिस्टर गर्दीला समजावत होते की…
‘आता तर हद्दच झाली आहे. आधी बाहेरून आलेल्या लोकांना मारहाण व्हायची. आता अर्णव खैरे, जो स्वतः महाराष्ट्रीयन आहे, त्याने फक्त ट्रेनमध्ये हिंदी बोलल्यामुळे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या अपमानामुळे त्याने दबावाखाली आत्महत्या केली. हे किती दिवस असे चालणार, यावर सरकारने उत्तर द्यावे.’ असंही आजमी म्हणाले.
Mumbai Crime : 13 वर्ष शरीरसंबंध, 3 वेळा गर्भपात; लग्नाच्या आमिषाने अत्याचार केसमधून मॅनेजरची सुटका, कोर्ट म्हणालं, आरोपीला बाळ झाल्यावर पेढे का वाटलेत?
अबू आजमी पुढे म्हणाले की, ‘जर मराठी भाषा बोलणेच गरजेचे असेल, तर शाळांमध्ये मराठी अनिवार्य करा, पुस्तके वाटा. पण, भाषेच्या कारणावरून मारहाण करणे थांबले पाहिजे. काँग्रेस, शिवसेना किंवा भाजप कोणतेही सरकार असो, सर्वजण फक्त राजकीय स्वार्थासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करताहेत. ज्यामुळे लोकांचा अपमान होत आहे. हे त्वरित बंद झाले पाहिजे आणि यावर कायदा करणे आवश्यक आहे. मुंबईत अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत. देशभरात त्यांचा व्यवसाय आहे पण मुख्यालय मुंबईत आहे. तिथे जाऊन त्यांना सांगा मराठी बोला. मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणी जाऊन सांगत नाही. पण गरीब रिक्षाचालक, भाजीविक्रेते, रस्त्यावर कष्ट करणारे मजूर त्यांनाच तुम्ही मारता आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करता. हे सर्व पाहुनही सरकार कोणतीही कारवाई करत नाही.’
