• Sat. Jun 6th, 2026
    Beed News: ‘…तर महाराष्ट्र बंद’, संतोष देशमुख हत्या प्रकरणासंबंधी घडामोडीवर मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा, नेमकं काय घडतंय?

    बीड: मस्साजोग गावचे तत्कालीन सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असताना, या पार्श्वभूमीवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः नाव न घेता अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर घेता टीका केली.

    जरांगे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाच्या आत आरोपींना फाशी दिली जाईल असे आश्वासन दिले होते, मात्र आता या तपासात विलंब होत असून प्रकरण मुद्दाम लांबवले जात असल्याची शंका निर्माण होत आहे.

    त्यांनी स्पष्ट केले की संतोष देशमुख यांच्या लहान मुलांना आज वडील दिसत नाहीत, त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत समाधान मिळणार नाही. काही लोकांना “आरोपी सुटणार आहे” अशा अफवा पसरवण्यास सांगितले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी परळीकर हा शब्दप्रयोग केला आहे.

    Kolhapur Crime: लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांना संताप अनावर, थेट चाकुने… ; नेत्याच्या मुलाला पोलिस कोठडी

    जरांगे पाटील यांनी इशारा दिला की, ज्या दिवशी या प्रकरणातील आरोपीला मुक्त केले जाईल, त्या दिवशी जिल्हा बंद करण्यात येईल आणि त्यानंतर राज्यही बंद करण्याची वेळ येईल. जरांगेंनी सरकारला प्रश्न केला की, काहीजण अशा प्रकारे वातावरण निर्मिती करतात आणि सरकारला अडचणीत टाकण्याचे वक्तव्य का करतात, हे शोधण्याची गरज आहे.

    “आरोपी सुटणार नाही, हे सत्य आहे,” असे ते म्हणाले. तसेच, हा सगळा प्रकार काही व्यक्तींनी आखून आणल्याचा त्यांनी दावा केला आहे.

    जरांगे पाटील म्हणाले की, तपास सुरुवातीला वेगाने सुरू होता कारण त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द महत्त्वाचा होता आणि नागरिक शांत राहिले होते. आता त्यात गती मंदावली असल्याचे दिसत आहे असंही त्यांनी सांगितले आहे.

    त्यांनी यावेळी क्रूर कृत्य करणारे आरोपी बाहेर फिरत आहेत आणि कृष्णा आंधळे अद्याप सापडत नसल्याची खंतही व्यक्त केली. “हत्या करताना आंधळे व्हिडिओ कॉलवर होता, तो पकडला तर मोठा उलगडा होईल,” असे त्यांनी नमूद केले.

    राज्य विधानसभेच्या अधिवेशनातही या प्रकरणाचा उल्लेख झाल्याचे सांगत त्यांनी सरकारने या केसचा निकाल चार ते पाच महिन्यांत निघावा अशी मागणी केली.

    “अशा लोकांना संरक्षण दिले तर आम्हाला अजित पवारांवर राग येणारच. चुकीच्या व्यक्तीला जवळ करण्याचे पाप करू नका,” अशी टीका त्यांनी केली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed