Nagpur News: जप्त तूप तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून आठ दिवस उलटूनही अहवाल प्रलंबित असल्यामुळे प्रकरणात संशयाचे ढग अधिकच गडद झाले आहे.
अवैध कत्तलखाने, गोवंश वाहतूक आणि गोमांस विक्रीशी निगडित बेकायदेशीर व्यवहार कामठी परिसरातील दीर्घकाळापासून सुरू असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात अन्न, औषधी प्रशासन व प्रदूषण नियंत्रण विभागाने दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाने विशेष तपास समिती गठित केली आहे.
Nagpur Crime: उधारीच्या किरकोळ वादातून दोघांनी तरुणाचा जीव घेतला, महेशला दगडाने ठेचून…; नागपुरात काय घडलं?
या समितीचा प्रस्तावित दौरा अलीकडेच झाला असून संबंधित कागदपत्रे, जप्त माल, प्रयोगशाळा अहवाल आणि स्थानिक चौकशीवर आधारित तपास अहवाल आयोगाला सादर करण्यात आला आहे. यासंबंधी समितीने पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी यांसोबतच मुख्यमंत्र्यांनाही कडक कारवाई करण्यासंबंधीची मागणी केली आहे. प्रकरणाबाबत आयोजित पत्रपरिषदेला प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. मनीषा पुंडलिक, आयोगाचे अशासकीय सदस्य संतकुमार गुप्ता, मनीष वर्मा, सुनील सूर्यवंशी तसेच सदस्य व विधी सल्लागार अॅड. विवेक कोलते उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणाबाबत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतमाता सेवा संघटना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, श्री शिवाई युवा फाउंडेशन (खैरी) आदी संस्थांनी गोसेवा आयोगाला निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकारामागे मोठे जाळे असल्याचा दावा संस्थांनी केला.
क्रूर नियती! लग्न समारंभ उरकून घरी येताना काळाने घेरलं, सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू
बिर्याणी दुकानांमध्येही विक्री ?
अत्यंत धक्कादायक म्हणजे, कामठी आणि नागपूर शहरातील काही बिर्याणी हाउसमध्ये गोमांस विक्री होत असल्याचा दावा या कारवाईनंतर समितीकडे विविध संघटनांनी केला आहे. या दाव्यांबाबत सखोल तपासणी करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.
