• Wed. Mar 11th, 2026
    अरे जरा थांब रे… घरच्यांकडून लग्नासाठी टाळाटाळ, डोंबिवलीत तरुणाने आयुष्य संपवलं

    Youth Ends Life Dombivli: डोंबिवलीत एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. मात्र, घरच्यांनी त्याला काही काळ थांबण्यास सांगितलं. त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    डोंबिवली: एका 19 वर्षीय तरुणाने महाराष्ट्रातील डोंबिवली येथे राहत्या घरी गळफास लावून आपल्या आयुष्याची अखेर केली. त्याला पसंत असलेल्या मुलीशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती, परंतु घरच्यांनी त्याला 21 वर्षांचा होईपर्यंत थांबायला सांगितले होते. या मानसिक तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना 30 नोव्हेंबर रोजी डोंबिवली परिसरात घडली असून, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

    डोंबिवलीत राहणारा हा तरुण मूळचा झारखंडचा रहिवासी होता आणि त्याचे आपल्याच गावातील एका मुलीवर प्रेम होते. तिच्यासोबत लग्न करण्याची त्याची तीव्र इच्छा होती. मात्र, त्याच्या घरच्यांनी त्याला लग्नासाठी तीन वर्षे थांबायला सांगितले होते. कायद्यानुसार मुलांसाठी लग्नाचे वय 21 वर्षे असल्याने, तो 21 वर्षांचा होईपर्यंत थांबण्याचा त्यांचा सल्ला देण्यात आला होता.

    Maharashtra Timesशाळेतून आला, वरच्या मजल्यावर गेला, दोन तासांनी आई पाहायला गेली अन् एकच किंकाळी; 13 वर्षांचा लक्ष्य जमिनीवर…

    घरच्यांचा हा सल्ला तरुणाला मान्य नव्हता. त्याला वाट पाहणं शक्य नव्हते. या कारणामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. या तणावामुळे त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची माहिती आहे.

    मानपाडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने 30 नोव्हेंबर रोजी आपल्या घराच्या छताला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    तरुण झारखंडमधील नेमका कोणत्या भागातील होता आणि त्याचे नाव काय होते, याबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलिसांनी या घटनेला अपघाती मृत्यू म्हणून नोंदवले आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन वयात प्रेमसंबंध आणि लग्नासाठी पालकांचा दबाव यामुळे तरुणांवर येणारा मानसिक ताण या घटनेतून समोर आला आहे.

    या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलण्यामागे आणखी काही कारण आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. घरच्यांचा दबाव, प्रेमसंबंधातील अडचणी किंवा इतर काही कारणे आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा