• Fri. Mar 6th, 2026

    Akola Crime : मित्राच्या भावाचं भांडण, मिटवण्यासाठी मध्यस्थी केली, अन् तिथेच घात झाला; आई-वडिलांपासून दूर असलेल्या गौरवला संपवलं

    Akola Crime : मित्राच्या भावाचं भांडण, मिटवण्यासाठी मध्यस्थी केली, अन् तिथेच घात झाला; आई-वडिलांपासून दूर असलेल्या गौरवला संपवलं

    Akola Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच अकोलामध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे.

    भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : अकोल्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निंबा-तेल्हारा मार्गावर स्थित कारंजा फाट्याजवळ सकाळच्या सुमारास एका 22 वर्षीय युवकाची बेदम मारहाण करून चाकूने भोसकून निघृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गौरव बायस्कार असं मृत युवकाचं नाव असून, हा तरुण भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून या प्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली आहे.

    मित्राच्या भावाबरोबर लोकांचा वाद

    मिळालेल्या माहितीनुसार, गौरव बायस्कर आणि त्याचा मित्र शेतातून काम करून घरी परतत असताना, वाटेत कारंजा रमजानपूर फाट्यावर मित्राच्या भावाबरोबर काही लोकांचा वाद सुरू असल्याने गौरव आणि त्याच्या मित्राने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. दरम्यान, दोघांनी गौरव याला मारहाण करून त्याच्यावर चाकूने सपासप वार करून हल्ला चढवला. यावेळी गौरवच्या पोटात आणि छातीत गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबतच त्याच्या मित्रावरही हल्ला झाला पण तो थोडक्यात बचावला.

    Maharashtra TimesBuldhana News : ‘ये धर याला, हे आधारकार्ड घे…’, तरुणाला नागरिकांकडून मारहाण, पोलिसांच्या तावडीतून बोगस मतदार निसटला; खळबळजनक VIDEO

    गौरवला गंभीर जखमी अवस्थेत पाहिल्यावर हल्लेखोर घटना स्थाळावरून पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी शिताफीने काही तासातच दोन आरोपींना ताब्यात घेतलं. एक आरोपी हा अल्पवयीन असून एक विजय मोरे नामक आरोपी असून संशयित आरोपी संतोष मोरे हा फरार आहे. यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास निरीक्षक पंकज कांबळे हे करीत आहेत. गौरव हा मुळचा बाळापुर तालुक्यातील अंदुरा येथील रहिवासी असून तो कारंजा येथील जिजामाता महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो कारंजा येथे वास्तव्यास होता. एका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे हल्ला करून हत्या केल्यानं, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis : निवडणुका पुढे ढकलण्याची पद्धत योग्य वाटत नाही, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, व्यवस्थेच्या फेल्युअरमुळे…

    अकोट नगर परिषद निवडणुकीत वातावरण तापलं

    अकोट नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५मधील नगरसेवकपदाच्या एमआयएमच्या उमेदवार उज्ज्वला तेलगोटे यांच्या पतीवर सोमवारी सकाळच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला. मतदानाच्या आदल्या दिवशी झालेल्या या हल्ल्याने राजकारण तापलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा