Mumbai Metro 10: मिरा भाईंदरमध्ये मेट्रो 10 च्या कामाला गती मिळणार आहे. गायमुख ते शिवाजी चौकापर्यंत ग्रीन लाईन मेट्रोसाठी टेंडर प्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरू होईल. हा प्रकल्प पूर्णपणे एलिव्हेटेड असून ९.७ किमी लांब असेल.
एमएमआरडीएच्या आज झालेल्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये ही माहिती देण्यात आली. ही मीटिंग मेट्रोच्या मुख्यालयात पार पडली. मेट्रो 10 हा प्रकल्प पूर्णपणे एलिव्हेटेड असून 9.718 किमी लांब असणार आहे. तब्बल 8 हजार कोटींच्या या प्रकल्पात 5 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. गायमुख, रेती बंदर, चेना गाव, वरसावा गाव, काशिमिरा आणि मिरागाव अशी ही पाच स्थानके असतील. या ग्रीन लाईन प्रकल्पावर 2031 पर्यंत 4.66 लाख प्रवासी असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मेट्रो 9 चा ‘तो’ वादग्रस्त कारशेड प्रकल्प अखेर रद्द! MMRDA चा मोठा निर्णय; नवी पर्यायी योजना काय?
या मार्गासाठी मोघरा पाडा येथे डेपो बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा मार्ग गायमुख येथे मेट्रो लाईन 4A ला जोडणार असून मेट्रो लाईन 9 वरून मिरागावला जोडणार आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सिस्ट्रा–डीबी संयुक्त उपक्रमाची सामान्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून वन, सीआरझेड, खारफुटी, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांसह अन्य अनिवार्य मंजुरी मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. सामान्य सल्लागारांनी मेट्रो बांधकाम आणि त्या अनुषंगाने असलेल्या 60 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी निविदा कागदपत्रे आधीच तयार केली आहेत.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मेट्रो 10 मुळे मिरा भाईंदर भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
रस्त्यावर मनसे सोबत असेल तर चालते, मग युतीत का नको? सचिन अहिरांचा सवाल
याशिवाय, मिरा भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन पुढील सहा महिन्यांत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
