• Sat. Mar 7th, 2026

    मुंबई मेट्रोमध्ये नवीन अपग्रेड! फुल्ली एलिव्हेटेड, 9.7 किमीची नवी मार्गिका; प्रताप सरनाईकांनी दिली संपूर्ण माहिती

    मुंबई मेट्रोमध्ये नवीन अपग्रेड! फुल्ली एलिव्हेटेड, 9.7 किमीची नवी मार्गिका; प्रताप सरनाईकांनी दिली संपूर्ण माहिती

    Mumbai Metro 10: मिरा भाईंदरमध्ये मेट्रो 10 च्या कामाला गती मिळणार आहे. गायमुख ते शिवाजी चौकापर्यंत ग्रीन लाईन मेट्रोसाठी टेंडर प्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरू होईल. हा प्रकल्प पूर्णपणे एलिव्हेटेड असून ९.७ किमी लांब असेल.

    मिरा-भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये आणखी एका मेट्रो प्रकल्पाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. गायमुख ते शिवाजी चौकापर्यंत उभारण्यात येणाऱ्या मेट्रो 10, म्हणजेच ग्रीन लाईन मेट्रोसाठी टेंडर तयार करण्याचे काम 15 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली आहे.

    एमएमआरडीएच्या आज झालेल्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये ही माहिती देण्यात आली. ही मीटिंग मेट्रोच्या मुख्यालयात पार पडली. मेट्रो 10 हा प्रकल्प पूर्णपणे एलिव्हेटेड असून 9.718 किमी लांब असणार आहे. तब्बल 8 हजार कोटींच्या या प्रकल्पात 5 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. गायमुख, रेती बंदर, चेना गाव, वरसावा गाव, काशिमिरा आणि मिरागाव अशी ही पाच स्थानके असतील. या ग्रीन लाईन प्रकल्पावर 2031 पर्यंत 4.66 लाख प्रवासी असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    Maharashtra Timesमेट्रो 9 चा ‘तो’ वादग्रस्त कारशेड प्रकल्प अखेर रद्द! MMRDA चा मोठा निर्णय; नवी पर्यायी योजना काय?

    या मार्गासाठी मोघरा पाडा येथे डेपो बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा मार्ग गायमुख येथे मेट्रो लाईन 4A ला जोडणार असून मेट्रो लाईन 9 वरून मिरागावला जोडणार आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सिस्ट्रा–डीबी संयुक्त उपक्रमाची सामान्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून वन, सीआरझेड, खारफुटी, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांसह अन्य अनिवार्य मंजुरी मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. सामान्य सल्लागारांनी मेट्रो बांधकाम आणि त्या अनुषंगाने असलेल्या 60 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी निविदा कागदपत्रे आधीच तयार केली आहेत.

    मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मेट्रो 10 मुळे मिरा भाईंदर भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

    रस्त्यावर मनसे सोबत असेल तर चालते, मग युतीत का नको? सचिन अहिरांचा सवाल

    याशिवाय, मिरा भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन पुढील सहा महिन्यांत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा