• Sat. Mar 7th, 2026
    निवडणुकांचे निकाल लांबणीवर, उद्धव ठाकरेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया; शिंदेंना टोले लगावत म्हणाले…

    Uddhav Thackeray on Local Body Election Results : निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून उद्धव ठाकरे यांची मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया आली आहे.

    उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज Nagar Parishad आणि Nagar Panchayat निवडणुकांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होणार होता, परंतु काही नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने आता सरसकट सर्वच निकाल पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा कोर्टात अपील प्रलंबित असलेल्या किंवा नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळालेल्या ठिकाणी निवडणुका आधीच 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होतील. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया आली आहे.

    उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    गेल्या काही महिन्यांपासून मातोश्रीवर रोजच पक्षप्रवेश सुरु आहेत. हवेत जसे प्रदूषण आहे तसे राजकारणात आहे. काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही युती तोडली. किंवा उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा करून धूळफेक करण्याचे काम करण्यात आले. धुळफेक केलेली असल्यामुळे कट्टर शिवसैनिक परत येतात. भाजप शिवसेनेवर अन्याय करतंय, म्हणून मी मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, असं सांगत कल्याण डोंबिवलीच्या सभेत राजीनामा देतोय, सांगितल्याचं पाहिलंय, मग कधी अजित पवार निधी देत नाही, अशी अनेक कारणे ठाण्याची लोकं देतात. मला शिव्या घालत होते, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आज त्यांच्या पोस्टरवर दिघे साहेबांच्या शेजारी सोनिया गांधी यांचा फोटो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.शिवसेनेचे वट आजही ठाण्यात आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचं आहे. मशाल वेगळी ठेवा, भगव्यावर कोणतंही चित्र छापू नका, तो शिवरायांचा आहे, तो पवित्र आहे, तो तसाच फडकला पाहिजे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. मशाल घेऊन पुढे चला, मशालीच्या तेजाने सर्व जळमटं जळून खाक होतील. इतरांनी जे केलं, ते तुम्ही करू नका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असताना, निवडणूक आयोगावर न बोललेलं चांगलं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा