Badlapur To Karjat Third and Fourth Line: रेल्वे आणि राज्य सरकार प्रकल्पासाठी निम्मा निम्मा आर्थिक खर्च उचलणार आहे. या उपनगरी रेल्वे विस्तार प्रकल्पासाठी १,३२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या बैठकीत बदलापूर-कर्जत तिसरी-चौथी मार्गिका आणि देवभूमी द्वारका (ओखा)-कनालस या रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणासही सरकारने मंजुरी दिली. दोन्ही रेल्वे प्रकल्पांसाठी २,७८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
चोवीस तासात अजितदादांचा राजीनामा झाला नाही तर दिल्ली गाठणार, अंजली दमानियांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
मुंबई-पुणेदरम्यान रेल्वे प्रवासाचा वेग वाढवणे आणि मुंबई उपनगरी रेल्वेवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कर्जत ते बदलापूरदरम्यान तिसरी-चौथी मार्गिका उभारण्यात येत आहेत. ३२ किलोमीटरच्या मार्गात आठ मोठे पूल, १०६ लहान पूल असे एकूण ११४ पूल आणि एक वाहने आणि पादचाऱ्यांसाठी बोगदा (रोडअंडर ब्रीज) तयार करण्यात येणार आहे.
बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गांमुळे मुंबई उपनगरी रेल्वेसह मुंबई-पुण्यातील प्रवाशांनाही लाभ होणार आहे. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस, मालवाहतूक यांसाठी स्वतंत्र मार्गिका निर्माण झाल्याने प्रवासासह मालवाहतुकीचा वेगही वाढणार आहे. स्वतंत्र रेल्वे मार्गामुळे ७.२ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक अपेक्षित आहे. यामुळे ४१ लाख लिटर आणि दरवर्षी ४६.२ कोटी रुपये बचत शक्य आहे. यामुळे दोन कोटी किलो कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जन रोखले जाईल. याचे प्रमाण आठ लाख झाडे लावण्याइतके आहे, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
जमीन व्यवहारांबाबत मोठी बातमी: जुने व्यवहार कायदेशीर कसे करायचे? सरकारकडून कार्यपद्धती जाहीर
मुंबई रेल्वे विकास महामंडळ कडून (एमआरव्हीसी) एमयूटीपी तीन ‘अ’ प्रकल्पांतर्गत कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी एक हजार ५१० कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. ऑक्टोबरअखेर प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात चिखलोली नवे रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे. नव्या स्थानक इमारतीचे पहिल्या मजल्यावरील काम पूर्ण झाले आहे. एमआयडीसी रेल्वे उड्डाणपुलासह २१ पुलांच्या उभारणीसह उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकातील फलाटांचा विस्तार पूर्ण झाला आहे, असे ‘एमआरव्हीसी’तील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या रेल्वेमार्गांच्या विस्तारामुळे भारतीय रेल्वेची गतिमानता लक्षणीयरीत्या वाढणार आहेत. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नवीन भारत’च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत. हे प्रकल्प स्थानिकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढवतील, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
‘रेअर अर्थ’ योजनेला हिरवा कंदील
नवी दिल्ली: भूगर्भातील दुर्मीळ भू-चुंबकाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या एकात्मिक दुर्मीळ पृथ्वी स्थायी चुंबक उत्पादनाच्या (सिंटर्ड रेअर अर्थ पर्मनंट मॅग्नेट-आरईपीएम) महत्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यासाठी ७, २८० कोटी रुपये खर्च येणार आहे.
Mumbai News: धक्कादायक! मतदार एकच, नावे 103 वेळा; दुबार मतदारांनी संख्या चार लाखांच्या वर
पुण्यात हडपसर, माणिकबागेपर्यंत मेट्रो
मेट्रोला पुणेकरांचा वाढता प्रतिसाद पाहून केंद्र सरकारने खडकवासला ते हडपसर आणि नळस्टॉप ते माणिकबाग या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांना बुधवारी मंजुरी दिली. पुणे मेट्रोच्या एकूण ३१.६३६ किमी लांबीच्या या दोन प्रकल्पांत २८ उन्नत मेट्रो स्थानके असतील. यामुळे दक्षिण आणि पश्चिम पुण्यातील आयटी परिसर, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था, वसाहती मेट्रोने जोडल्या जातील. पुढच्या पाच वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असलेल्या या प्रकल्पांसाठी सुमारे ९,८५७.८५ कोटी रुपये खर्च येईल.
कल्याण ते बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका
खर्च : १,५१० कोटी रुपये
ऑक्टोबरअखेर ३० टक्के काम पूर्ण
बदलापूर ते कर्जत तिसरी – चौथी मार्गिका
खर्च : १,३२४ कोटी रुपये
केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
