• Sun. Mar 8th, 2026

    Mumbai Local: सेकंड क्लासच्या भाड्यात करा एसी लोकलचा प्रवास; फडणवीसांची मोठी घोषणा, जाणून घ्या कोणत्या असतील सुविधा

    Mumbai Local: सेकंड क्लासच्या भाड्यात करा एसी लोकलचा प्रवास; फडणवीसांची मोठी घोषणा, जाणून घ्या कोणत्या असतील सुविधा

    Mumbai AC Local: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये लवकरच पूर्णपणे वातानुकूलित (AC) कोचेस आणि स्वयंचलित करण्याची घोषणा केली आहे. सेकंड क्लासच्या भाड्यात कोणताही बदल न करता नवीन AC लोकल ट्रेन जुन्या डब्यांची जागा घेतील.

    मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेच्या मोठ्या अपग्रेडची घोषणा केली असून, लवकरच लोकल ट्रेनमध्ये पूर्णपणे वातानुकूलित (AC) कोचेस आणि स्वयंचलित दरवाजे असतील, तेही सेकंड क्लासच्या भाड्यात कोणताही बदल न करता.

    IIMUN यूथ कनेक्ट कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की मुंबईची लोकल ही शहराची लाईफलाईन आहे, ज्यामध्ये दररोज सुमारे 90 लाख प्रवासी प्रवास करतात . गर्दी आणि सुरक्षेची गंभीर समस्या कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. नवीन लोकल ट्रेन “मेट्रोसारख्या” असतील, आधुनिक सुविधांनी सुसज्ज, ज्यामुळे प्रवाशांचा आराम वाढेल आणि अपघातांचा धोका कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra Timesमध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! नव्या वर्षात 15-डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार; ‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर असतील थांबे

    मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेत 268 नवीन AC लोकल ट्रेन घेण्याचा समावेश आहे. या ट्रेन हळूहळू जुन्या, दरवाजेविरहित डब्यांची जागा घेतील. एवढ्या मोठ्या अपग्रेडनंतरही सेकंड क्लासच्या प्रवाशांसाठी तिकीट दर वाढवला जाणार नाही, यावर फडणवीसांनी जोर दिला.

    मुंब्रा दुर्घटनेनंतर ही घोषणा

    मुंब्रा येथे अलीकडेच झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर ही घोषणा करण्यात आली आहे, जिथे गर्दीच्या नॉन-AC डब्यातून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. स्वयंचलित दरवाज्यांची व्यवस्था ही रेल्वे सुरक्षेच्या व्यापक सुधारणा योजनेचा भाग आहे; नव्या नॉन-AC लोकलमध्येही अपघात टाळण्यासाठी सेल्फ-क्लोजिंग दरवाज्यांची रचना केली जात आहे.

    मराठी माणसाला धोक्याचा इशारा, सावध राहण्याचा सल्ला, राज ठाकरे म्हणाले…

    मुंबई वनचे कौतूक

    या अपग्रेड्ससोबतच फडणवीसांनी ‘मुंबई वन’ अॅपचंही कौतुक केलं. हे अॅप लोकल, बस आणि मेट्रोसाठी तिकीट खरेदी करण्याची एकाच ठिकाणी सुविधा देते, त्यामुळे प्रवास अधिक सोपा होतो. शहराची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि दररोजच्या प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी करण्यासाठी अशा सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या उपनगरी रेल्वे नेटवर्कच्या या बदलांमुळे त्याच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण होणार असून, सामान्य नागरिकांसाठी प्रवास परवडण्याजोगाच राहणार आहे.यामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचत आहे आणि सोप्या पद्धतिने तिकिट काढू शकत आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा