Nagpur Student Commits Suicide : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल न दिल्यानं एका 13 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केलीय. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत विद्यार्थिनी खापरखेड्यातील एका विद्यालयात आठवीत शिक्षण घेत होती. सोशल मीडियावर ती सक्रिय होती. अलीकडील काळात तिचा मोबाईलवरील वेळ वाढत चालल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. यामुळे तिच्यावर मोबाईल वापरावर नियंत्रण आणलं जात होतं. काही दिवसांपासून तिने मोबाईल देण्याची मागणी सातत्याने केली होती. परंतु तिचा अभ्यासाचा विचाराने कुटुंबीयांनी तिला मोबाईल देण्यास नकार दिला. यामुळे दिव्या नाराज झाली व तिने हा नकार मनावर घेतला.
Dhule Crime : ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय, अल्पवयीन मुलाचं अपहरण, लोखंडी बैलगाड्याला बांधलं, खालून जाळ केला अन्…; महाराष्ट्र हादरला
दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास तिची आई आणि बहीण घराबाहेर बसल्या होत्या. त्याचवेळी दिव्या घरात गेली आणि गळफास लावून घेतला. काही वेळाने घरच्यांनी घरात प्रवेश केल्यावर त्यांना दिव्या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी तात्काळ तिला खाली उतरवून रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सुरू असून, यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या काळजाला चटका लावणाऱ्या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात दुःख आणि शोककळा पसरली असून बालमनावर मोबाईलच्या व्यसनाचे वाढते दुष्परिणाम पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत.
Raigad Crime : डोक्यापासून छातीपर्यंत जखमा, रक्ताने माखलेल्या लाकडी पट्ट्या; हिराबाई जोशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा
लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक दबावाची ही गंभीर जाणीव आहे. तज्ञांच्या मते पालकांनी मुलांशी संवाद वाढवत त्यांच्या भावनिक गरजा ओळखणं गरजेचं आहे. मोबाईल नकाराचा विषय नसून त्यामागील अस्वस्थता, एकटेपणा, अपेक्षा याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. अशा घटना टाळण्यासाठी कुटुंब, शाळा आणि समाजाने एकत्रितपणे पावले उचलण्याची गरज असल्याचे मानसोपचारतज्ञ सांगतात. मुलांना पर्यायी छंद, खेळ, क्रीडा, आणि कुटुंबातील सहभाग वाढवणे आवश्यक आहे.
