Jalna man killedघनसावंगी तालुक्यातील शेवता शिवारात झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांनी वडील आणि मुलावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात वडिलांचा मृत्यू झाला.
शेवता येथील लक्ष्मण कांबळे आणि त्यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांचा आरोपींशी यापूर्वी छोट्या–मोठ्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर पुढे भांडणात झाले. त्याच रागातून 22 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारास सहा जणांनी त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत काठ्यांनी भयंकर मारहाण केली. हल्ला इतका जबरदस्त होता की लक्ष्मण कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.
Jalna News: चेकपोस्टवर ट्रक चालकाचा मृत्यू, आरटीओ पोलिस अधिकाऱ्यांवर मुलाचा गंभीर आरोप, जालन्यात तणाव
लक्ष्मण कांबळे जमिनीवर कोसळताच हल्लेखोरांनी तातडीने घटनास्थळावरून पळ काढली. ही बातमी क्षणात गावभर आणि मग जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या प्रकरणी शशिकांत कांबळे (वय 35) यांच्या फिर्यादीवरून आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सहा जणांविरुद्ध तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींत 1) राहुल सखाराम सोनवणे, 2) विकास सखाराम सोनवणे, 3) सखाराम विश्वनाथ सोनवणे, 4) कमलबाई सखाराम सोनवणे, 5) अनिता राहुल सोनवणे आणि 6) कल्पना विकास सोनवणे यांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नगरपरिषद निवडणुकीत ओबीसी मतदारांनी फक्त ओबीसी उमेदवारालाच मतदान करावं : वाघमारे
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच जिल्ह्यात सतत होत असलेल्या हल्ले, वाद, खून–खराब्यामुळे जालना जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. छोट्या–मोठ्या कारणांवरून नागरिक थेट जीवघेण्या हिंसेकडे वळत असल्याचे चित्र भयावह आहे. सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे अत्यंत गरजेचे असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
