उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी माळेगाव साखर कारखान्ययाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उतरले होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी ते स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष गेलं होतं. आता आपण ही निवडणूक का लढवली? याबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : “मी जर माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतःचे अध्यक्षपद जाहीर केले नसते तर माझा पॅनलच निवडून आला नसता. त्यामुळे मला ही उमेदवारी जाहीर करावी लागली होती. माझ्या स्वप्नातही मी माळेगावचा चेअरमन व्हावे असे वाटले नव्हते”, असा गौप्यस्फोट खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माळेगावात केला. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील पडद्याआडच्या कहाण्या आज स्वतः अजित पवारांनी सांगितल्या. अजित पवार आणि कट्टर विरोधक असलेले रंजन तावरे माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत. आज ते व्यासपीठावर एकत्र होते आणि साहजिकच अजित पवारांनी स्वतःच हा मुद्दा स्पष्ट केला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर अजित पवार यांनी जेष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांना निवडणूक एकत्र लढवण्याबाबत प्रस्ताव दिला होता. यामध्ये अजित पवार गटाला 11 जागा तर चंद्रराव तावरे यांना 10 जागा देण्याचा प्रस्ताव होता. तर कारखान्याचे अध्यक्षपद दोन्ही गटांना प्रत्येकी अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव होता. मात्र पुढे काय झाले ते लक्षात आले नाही, असे आज अजित पवार यांनी सांगितले. मागील काही सभांमध्ये अजित पवार यांनी या स्वरूपाचा प्रस्ताव असल्याचे फेटाळले होते. मात्र आज रंजन तावरे व्यासपीठावर येताच अजित पवारांनी मनातील सगळ्याच जुन्या गोष्टी सांगितल्या. शरद पवार ‘गेम’ फिरवणार, भाजपला धडकी भरवणारी बातमी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही महिन्यांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. या निवडणुकीत चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा गट विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशी थेट लढत रंगली होती. स्वतः अजित पवार यांनी या कारखान्याचे चेअरमन होण्याची इच्छा त्यावेळी जाहीर केली होती. ते चेअरमनही झाले. निवडणुकीच्या काळात कारखाना बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही बाजूंनी चर्चा करून निवडणूक टाळण्याचा आणि कारखाना बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता, अशीही चर्चा त्यावेळी होती. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात दुरावा? समोरासमोर आले, पण संवाद नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी प्रस्ताव मांडला होता. राष्ट्रवादी पक्षाला ११ जागा, चंद्रराव तावरे गटाला १० जागा अशी समझौता योजना ठरली होती. पण त्यानंतर त्या चर्चेचे नेमके पुढे काय झाले, याबाबत स्पष्टता मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा