Cooper Hospital Mumbai: उपचार घेऊन बरे झाल्यानंतरही परब यांना काही दिवस रुग्णालयात ठेवून घेण्यात आले होते. त्या कालावधीच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.
या रुग्णालयामध्ये यकृताच्या आजारावर उपचार घेण्यासाठी प्रकाश परब (५२) हे दाखल झाले होते. त्यांना पुरुषांच्या वैद्यकीय रुग्णकक्षामध्ये दाखल करण्यात आले. ते आजारातून बरे झाल्यानंतरही, त्यांना दोन दिवसांनंतर घरी सोडण्यात येणार होते. सोमवारी पहाटे ४ वाजता ते शौचालयामध्ये गेले. तिथून परतताना त्यांचा पाय घसरून ते पडले. त्यामुळे डोक्याला मार लागून रक्तस्त्राव सुरू झाला. पुरुष वैद्यकीय रुग्णकक्षातील परिचारिकांनी ड्युटीवरील तिन्ही डॉक्टरांना त्वरित फोन करून ही माहिती दिली. मात्र डॉक्टरांना सतत फोन करण्यात येऊनही, तिघांपैकी एकही डॉक्टर मदतीसाठी आले नाहीत. दोन तासांनंतर डॉक्टरांनी परब यांच्यावर उपचार केले. मात्र तोपर्यंत बराच रक्तस्त्राव झाला होता. अखेर सोमवारी सायंकाळी ७ वाजता परब यांचा मृत्यू झाला.
‘समृद्धी’ ठरतोय अपघातमार्ग; अकरा महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ जणांनी गमावला जीव, मोठी आकडेवारी समोर
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याने मृत्यूचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. परब हे एनआयसीयूमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना वैद्यकीय रुग्णकक्षामध्ये पाठवण्यात आले. ते पडून जखमी झाल्यानंतर, त्यावेळी ड्युटीवर असलेले न्यूरोसर्जन, निवासी डॉक्टर यांनी त्यांच्यावर उपचार करून जखमेवर टाके मारले, अशी माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी दिली.
Ladki Bahin Yojana : वडील किंवा पतीचं निधन, अथवा घटस्फोटीत महिलांनी E-KYC कशी करावी? सरकारकडून महत्त्वाची सूचना
पूर्णवेळ अधीक्षकाची प्रतीक्षाच
‘कूपर’मध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे रुग्णालयाची अंतर्गत व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्याचा ताण रुग्णसेवेवर येत आहे. व्यवस्था सुधारण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचा कार्यभार एकाच जबाबदार व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे. पालिका प्रशासनाने पूर्णवेळ वैद्यकीय अधिष्ठाता नियुक्त करण्याचे आश्वासनही दिले होते. प्रत्यक्षात त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे रुग्णालयातील अंतर्गत व्यवस्थेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. ही व्यवस्था सुधारावी, यासाठी पालिका प्रशासन कधी पावले उचलणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

