• Sat. Mar 7th, 2026
    फडणवीस सरकारकडून लाडक्या बहि‍णींना 43 दिवसांचं गिफ्ट, लाभार्थींच्या भावाचं ‘आधार’ चालणार का? युजर्सना शंका

    Mukhyamantri Ladki Bahin Yojna : ई-केवायसी करण्याची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंतच होती, परंतु ही प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे तिला मुदतवाढ देण्यात आली आहे

    लाडकी बहीण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थींना आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. म्हणजेच या प्रक्रियेसाठी अधिकचे ४३ दिवस मिळाले आहेत. ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्यांच्यासाठीही नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे.

    संबंधित महिलांनी स्वतःचे ई-केवायसी स्वत: करावे, आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी, असे महिला आणि बाल विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला आणि पुरुषांनीही घेतल्याने निदर्शनास आले होते. अपात्रांना सेवेतून वगळून सरकारी निधीची बचत करण्यासाठी लाभार्थींची ई-केवायसी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी १८ सप्टेंबरपासून विशेष मोहिमेला सुरुवात केली होती.

    ई-केवायसी करण्याची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंतच होती. परंतु ही प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत वाढवणार की नाही, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागून होते. परंतु लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे.
    Maharashtra TimesNashik News : काँग्रेसचा मिठाचा खडा, अखेर मनसेचा मोठा निर्णय, स्वबळावर लढण्याची तयारी सुरु, महायुतीला फायदा?
    महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयी ‘एक्स’वर पोस्ट करत ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले. मंत्री तटकरे म्हणाल्या, ‘ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतः ई-केवायसी करावे आणि त्यांचे पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे.’

    दरम्यान, काही जणांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून आदिती तटकरे यांना टॅग करुन आपल्या शंका विचारल्या आहेत. अंकुश खाडे नावाच्या युजरने विचारले आहे की एका महिलेच्या भावाचे आधार कार्ड टाकले आणि यानंतर नवीन जीआर आला, की वडिलांचा मृत्यू दाखला अपलोड करा, पण आता पुन्हा केवायसी करण्यासाठी साईटवर लॉग इन होत नाही, त्यात संबंधित आधार नंबरवर आधीच केवायसी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. लाभार्थ्यांच्या शंकांना मंत्री किंवा विभागाकडून काय उत्तर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    Maharashtra TimesPune News : राजकारण बाजूला सोडलं, शिंदेंच्या उमेदवार मनिषा गोरेंना ठाकरेंचा पाठिंबा, कारण वाचून अभिमान वाटेल

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा