Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर चार नवीन लेन वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय झाला आहे. यामुळे हा मार्ग दहा पदरी होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल.
एसएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार असून तो राज्य सरकारसमोर सादर करण्याची तयारी सुरू आहे. सरकारकडून मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर चार नवीन लेन वाढवण्याचे काम 2030 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कुर्ला–घाटकोपर कोंडीपासून सुटका! LBS रोडवरील उड्डाणपुलासाठी BMC चा 1365 कोटींचा मेगा प्लॅन जाहीर; कधी पूर्ण होणार काम?
या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 14,260 कोटी रुपये इतका असून, यातील 40 टक्के हिस्सा राज्य सरकार उचलणार आहे. उर्वरित खर्च एमएसआरडीसीकडून करण्यात येणार आहे. अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, राज्य सरकारकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर द्रुतगती मार्गावरील टोल वसुलीची मुदत 30 एप्रिल 2045 नंतरही वाढवली जाणार आहे.
मिसिंग लिंक प्रकल्प
दरम्यान, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ आला असून, तो येत्या वर्षाच्या सुरुवातीला उद्घाटनासाठी सज्ज होऊ शकतो. हा दुवा कार्यान्वित झाल्यानंतर हजारो वाहनचालकांसाठी प्रवास अधिक सुगम, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
भारताचं वैशिष्ट्य सांगितलं, भाजपला डिवचलं, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
13.3 किमी लांबीचा हा नवा मार्ग खंडाळा आणि लोणावळा घाटातील वाहतूक-कोंडीला पर्याय ठरणार आहे. सध्या खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट या दरम्यान वाहनांना सुमारे 19 किमी घाटरस्ता पार करावा लागतो. या मार्गावर वारंवार होणारी कोंडी, वाहनांचे बिघाड आणि भूस्खलन यामुळे प्रवास मंदावतो. मात्र, ‘मिसिंग लिंक’ तयार झाल्यावर मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ किमान 30 मिनिटांनी कमी होणार आहे.

