• Fri. Mar 6th, 2026
    Sharad Pawar: बिहारमध्ये सुपडा साफ, काँग्रेसचं भवितव्य काय? शरद पवारांचं मत चर्चेत

    Sharad Pawar comment on congress party future: शरद पवारांनी काँग्रेस पक्षाला भविष्य आहे की नाही या विषयावर भाष्य केलं आहे. ते आज सोलापूर दौऱ्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे, ते म्हणाले की……

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. बिहारमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं आहे. तर महागठबंधनला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस पक्षही महागठबंधनसोबतच या निवडणुकीत उतरला होता. पण, काँग्रेसची स्थिती तर अतिशय बिकट झाली आहे. बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त सहाच जागांवर विजय प्राप्त करता आला आहे.

    एकूण 60 जागा लढणाऱ्या काँग्रेसला बिहारमध्ये दारुण पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे काँग्रेसचं संपूर्ण देशातून पतन होतंय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी भाष्य केलं आहे. त्यांनी काँग्रेसला भविष्य आहे की नाही हे थेटपणे सांगितलं आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

    Maharashtra TimesDevendra fadanvis: स्थानिक निवडणुकांतही विरोधकांचा सुपडा साफ होणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, ‘भाजप मोठा पक्ष…’

    सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी काँग्रेस पक्षाच्या भवितव्यावर भाष्य केलं आहे. मला जी काँग्रेस समजते ती संपणारी नाही, गांधी नेहरुंची विचारसरणी स्वीकारणारी काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल आणि वेगळ्या स्थितीला पोहचेलं, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

    शरद पवार म्हणाले…

    यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला विचार केला तर, 1957 साली राज्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. लोकांनी महाराष्ट्र समितीला निवडणून दिलं होतं. त्याहीवेळी काँग्रेस संपली असं वाटलं, पण पक्ष अशा प्रकारे संपत नसतात. तो एक विचार असतो. मला जो काँग्रेस पक्ष समजतो तो संपणारा नाही, गांधी नेहरुंचा विचारसरणी स्वीकारणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल असं मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

    निकालावर बोलताना पुढे शरद पवार म्हणाले की, बिहार असो किंवा महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी महिलांना पैसे वाटप करण्यात आले, नगरपालिका निवडणुकांत पैसे वाटप केले जातात हे ऐकून होतो पण सरकारच्या माध्यमातून सबंध महिलांना दहा हजार देणं हे आम्ही कधी ऐकलं नाही. याचे परिणाम कसे होतात ते लाकांनी ठरवले पाहिजे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा