• Sat. Mar 7th, 2026
    काही लोक आपल्याला गणतीत धरतच नाहीत! गुलाबराव पाटलांची भर भाषणातून भाजपवर टीका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जळगाव महापालिकेत योग्य सन्मान मिळाल्यास युतीतून लढू, अन्यथा….स्वबळावर निवडणूक लढवू, असे स्पष्ट विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव शहरात उद्धव ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ते म्हणाले, “काही लोक आपल्याला गणतीत धरतही नाहीत. गेल्या निवडणुकीत आमच्या केवळ…१४-१५ जागा आल्या, मात्र नियोजन आणि समितीच्या माध्यमातून भरघोस निधी आणला. शिंदेंनी ८० पैकी ६० जागा जिंकून दाखवल्या, शिवसेनेत ४० वर्षांत जे शक्य नव्हते ते साध्य झाले.गुवाहाटीला गेल्यावर पन्नास खोके एकदम ओकेच्या टीका झाल्या…त्या आवाज अजूनही कानात ऐकू येतात,” असंही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed