• Wed. Mar 11th, 2026
    Jalgaon Crime : किरकोळ कारणातून कडाक्याचं भांडण, काही क्षणात फायरिंगचा आवाज, एका तरुणाचा जागीच मृत्यू; जळगाव पुन्हा हादरलं

    Jalgaon Firing One Dead : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, जळगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून गोळीबार करण्यात आला आहे.

    जळगाव कांचन नगर गोळीबार तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : जळगाव शहरातील कांचन नगर भागात काल रात्री साडेदहाच्या सुमारास दोन जणांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादाचं रूपांतर थेट गोळीबारात झालं. या धक्कादायक घटनेत एकजण ठार झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. जळगाव शहरात गोळीबाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यात पोलीस प्रशासनाचं हे अपयश म्हणता येईल?

    काल रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कांचननगर भागात दोन गटांमधील वादाचे पडसाद गोळीबारात झाले. रात्री कांचन नगरातील विलास चौकात आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर कोळी यांच्यात शाब्दीक वाद झाले. यानंतर आकाश सपकाळे तसेच त्याच्यासोबत असलेल्या करण उर्फ तांडव राजपूत या दोघांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून गोळीबार सुरू केला.

    Maharashtra TimesJalgaon Crime News : अतिक्रमणात असल्यानं प्रशासनाचे इमारत पाडण्याचे आदेश, धक्क्याने संस्थाचालकाचं टोकाचं पाऊल; पत्नी अन् लेकाचा हंबरडा

    गोळी लागल्यानं तरुणाचा मृत्यू

    जळगाव शहरात दुपारी तांबापुर भागामध्ये क्रिकेटच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली, ही घटना दुपारी झाली. या घटनेत पोलिसांनी सौम्य लाठीमार करत घटना नियंत्रणात आणण्यात आली. मात्र, या घटनेला काही तास उलटत नाहीत तोवर रात्री साडेदहाच्या सुमारास कांचन नगरामध्ये दोन मित्रांमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर या तरूणाला गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रूगणालयात दाखल केलं. तथापि, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर, या गोळीबारात गणेश रविंद्र सोनवणे, तुषार रामसिंग सोनवणे आणि सागर सुधाकर पाटील हे तीनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    अवैध दारू विक्रेत्याकडून गोळीबार

    काही दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरातील एकाकंपनीच्या परिसरात अवैध दारू विक्रेत्याने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याला काही दिवस उलटत नाही तोच जळगाव शहरात पुन्हा गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसर हादरला आहे. यातून कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचं अधोरेखीत झालं आहे.

    Maharashtra TimesSangli Fire News : भांड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू; अग्नीतांडवाने सांगलीत हळहळ

    दरम्यान, गोळीबाराची घटना माहिती पडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. डीवायएसपी नितीन गणापुरे, एलसीबीचे निरिक्षक राहूल गायकवाड यांनी तात्काळ तिथे भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याचं काम सुरू होतं. जळगाव शहरात वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा