Jalna Accident News : भोकरदन तालुक्यात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 40 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर 2025 रोजी, शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अजिंठा – बुलढाणा या महामार्गावर भोकरदन तालुक्यातील धावडा मढ या गाव परिसरामध्ये आपलं दैनंदिन कामं आटोपून घराच्या दिशेने जाणारे अल्पभूधारक शेतकरी गणेश भगत, वय 40 वर्षे, राहणार वालसावंगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, हे आपली दुचाकी घेऊन घराच्या दिशेने जात होते. अजिंठा – बुलढाणा या महामार्गावरून घराच्या दिशेने आपली दुचाकी घेऊन ते निघाले. संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास अजिंठा – बुलढाणा या महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यांच्या दुचाकीला जोराची धडक देताच अज्ञात वाहन अपघात स्थळावरुन पसार झालं.
Palghar News : मासेमारी करताना बोटी चुकून पाकिस्तान हद्दीत; पालघरचा मच्छिमार पाकच्या ताब्यात, आठ जणांचा समावेश
यावेळी त्या मार्गावरून जाणाऱ्या काही वाहन चालकांनी हा अपघात पाहिला आणि गणेश भगत यांच्या जवळ जाऊन पाहणी केली असता यावेळी दुचाकीवरील गणेश भगत हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. यावेळी त्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गणेश भगत यांनी घटनास्थळावरच प्राण सोडलं. त्यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागल्याने अतिरक्तस्राव झाला आणि यातच त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. पारध पोलिसांना याची माहिती दिली. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात आला मात्र तोपर्यंत ते अज्ञात वाहन पसार झालं होतं.
Jalna News : रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली, बाईक धडकली आणि क्षणात होत्याचं नव्हतं; तरुणासोबत भयंकर घडलं
गणेश भगत या शेतकऱ्याच्या घरी घटनेची माहिती मिळताच कुटुंबाने एकच आक्रोश केला. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं, तिथे उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं असून या अपघाताची नोंद पारध पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे, तर त्या अज्ञात वाहनाचा शोध सध्या पोलीस घेत आहे.
डंपरचा अपघात, कुटुंबाचा आक्रोश… पोलिसांनी सांगितलं पुणे अपघाताचं वास्तव
गणेश भगत यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या परिवाराचा सध्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण गणेश भगत हेच त्या परिवारातील मुख्य कर्ते पुरुष होते आणि तेच गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत आलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

