• Sun. Mar 8th, 2026
    दुसऱ्यांचं आयुष्य सुरक्षित राहण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न, पण त्यालाच नियतीनं गाठलं; गणपतीपुळे किनाऱ्यावर हृदयद्रावक घटना

    Ratnagiri News : गणपतीपुळेमध्ये एका जेट्स स्की रिपेरिंग करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद लाड, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे समुद्रकिनारी वारंवार समुद्रात बुडून मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. स्थानिकांच्या सूचना पर्यटक पाळत नसल्याने अतिउत्साहाच्या भरात समुद्रात पाहण्यास गेल्याने हे प्रकार अनेकदा घडत आहेत. अशा अनेक घटना ताज्या असतानाच गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर चालणाऱ्या जेट्स स्की रिपेरिंग करणाऱ्या इंजिनीयरचा गणपतीपुळे येथे अचानक चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आशिष रमेश लाड (वय 44, अरिहंत बिल्डिंग, साळवी स्टॉप रत्नागिरी) असं या तरुणाचं नाव आहे.

    इंजिनिअरचा दुर्दैवी अंत

    रत्नागिरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशिष लाड हे गणपतीपुळे येथे काम करण्यासाठी आले होते. पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाचं असलेल्या जेट्स स्की रिपेरिंग करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. आशिष हे गणपतीपुळे येथे स्पोर्ट जेट्स स्कीचं दुरुस्तीचं काम पूर्ण करून परत निघाले होते. त्यावेळी ते गणपतीपुळे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलीस चौकीसमोर वाट बघत उभे होते. त्याचवेळी त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले.
    Maharashtra TimesRailway Ticket Booking : रेल्वे तिकीट बुकिंगसाठी नवी सुविधा, प्रवाशांना मोठा दिलासा, कशी आहे प्रोसेस? पुण्यात पहिल्यांदाच सुरूवात

    गणपतीपुळे किनाऱ्यावर तरुणासोबत काय घडलं?

    चक्कर येऊन ते खाली पडल्यानंतर त्यांना तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने गणपतीपुळे जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत निष्ठूर नियतीने डाव साधला होता. वैद्यकीय अधिकारी यांनी आशिष यांना तपासून त्यांना मृत घोषित केलं. ही दुर्दैवी घटना गणपतीपुळे येथे शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा घडली.

    केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू प्रकरण, शक्तिधाम रुग्णालयात काय घडलं?

    कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    आशिष लाड हे गेले कित्येक वर्ष रत्नागिरी येथे स्थायिक आहेत. त्यांचे भाऊ आणि नातेवाईक मुंबईमध्ये असतात. आशिष यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, भाऊ असं कुटुंब आहे. आशिष यांच्या मृत्यूने लाड कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या संपूर्ण घटनेची नोंद रत्नागिरी जयगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ, शोक व्यक्त केला जात आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा