Uddhav Thackeray Marathwada tour: शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्याची मागणी केली. निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधान मोदी पॅकेज जाहीर करतील, असेही ते म्हणाले.
“तुम्ही सर्व शेतकरी आहात ना, माझ्यासारखे शहरी तर नाहीत ना? मी खरं सांगतो मला शेतीमधलं काहीच कळत नाही, आता कर्जमुक्ती केली नाही तर मग कधी करणार? जमीन खरडून गेली आहे तरीही इकडे कोणी येत नाही, पूर्ण माती वाहून गेली आहे. सर्व बोगस कारभार चालू आहे. मत चोरी शिवाय सरकार दुसर काहीच करत नाही. वेळ आली तर धोंडे मारा. असे, मी म्हणणार नाही. ” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
Vijay Vadettivar: ‘मंत्री प्रताप सरनाईकांनी दोनशे कोटींची जमीन तीन कोटींमध्ये लाटली’, विजय वडेट्टीवार यांचे खळबळजनक आरोप
“केंद्रीय पथक तुमच्या दारात आले की नाही? परदेशी समिति आली की नाही? मग जुलैपासून परदेशी झोपले का? केंद्रीय पथक आता येऊन गेले, केंद्रीय समिती तुमच्याकडे येणार नाही. आता निवडणुका आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या हाताला पाने पुसण्यासाठी कोणततरी पॅकेज जाहीर करतील.” असेही उद्धव ठाकरे म्हणालेत.
पंतप्रधानांचे सर्वात जास्त प्रेम बिहारवर आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते, यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करतो की, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, बिहारमधील महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार टाकले तसे तुम्ही देशातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये टाका.”
शक्तिपीठ महामार्गबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकार सिमेंट कारखान्यासाठी आदानीला सिमेंट कंपनीसाठी पंतप्रधान मोदींनी नियम बदलून कल्याण डोंबिवली मध्ये जागा दिली. जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा दाबणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही, गहू तांदूळ सडका मिळतो. त्याला त्यांनाच शिजवून खाऊ घाला आणि म्हणा खा -पी मात्र आमचं काम कर. आमचे पंचनामे पूर्ण कर, नंतर आम्ही तुला सोडतो.” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
“मोदीजींनी नोटबंदी केली तशी महायुतीसाठी तुम्हाला वोटबंदी करावी लागेल. नुकसान भरपाई, कर्जमुक्ती होईपर्यंत महायुतीला मत नाही, असे धोरण बनवा,” असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“हे सातबारा कोरा करू असे म्हटले होते, कर्जमुक्ती होईपर्यंत तुम्हाला मतदान नाही असं म्हणल्याशिवाय हे गुडघ्यावर येणार नाहीत”, असं उद्धव ठाकरेंनी म्हटल आहे. त्याचवेळी आत्महत्या करू नका, घरदार उघड पडतं. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत. काळजी करू नका,आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा दिलासाही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला आहे.

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा
