Good News For Ration Card Holder: सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणारे धान्य यावेळी थेट घरपोच देण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ५९४ दिव्यांग आणि ६४३ वृद्ध नागरिक अशा १ हजार २३७ कुटुंबांपर्यंत प्रशासनाने स्वत: जाऊन प्रती कुटुंब २० किलो गहू व १५ किलो तांदूळ असे ३५ किलो धान्य शुक्रवारी पोहोचविले.
व्यापाऱ्यांकडून FDAची राजरोस वसुली! मंत्र्यांच्या जिल्ह्यातच सरकारी बाबूंकडून ‘खंडणी’, प्रकरण काय?
जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनात या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली आहे. अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदारांनी स्वत: लाभार्थ्यांच्या घरी जाऊन धान्य वितरीत केल्याने लाभार्थींनाही सुखद धक्का बसला. जिल्हाधिकारी डॉ. प्रसाद म्हणाले, शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास प्रशासनाचे प्राधान्य असणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर जाण्याची गरज पडू नये याकरिता आम्ही घरपोच सेवा देणे सुरू केले आहे. यामुळे प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी, तालुका पुरवठा अधिकारी, ग्रामसेवक, आशा सेविका तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नागरिकही या संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोनातून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचे कौतूक करीत असून, ही मोहीम कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरणार आहे.
Nashik Leopard Attack : पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याचा हल्ला, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह; बॉडी बघताच आई-वडिलांचा आक्रोश
तालुकानिहाय लाभार्थी
तालुका –लाभार्थी कुटुंब
बागलाण –३३
चांदवड –१०५
देवळा –२२
दिंडोरी –३३
मालेगाव –३१
नाशिक –८९
इगतपुरी –११७
कळवण –४९
मालेगाव –१३६
नांदगाव –१०
नाशिक तालुका –३६
निफाड –१५
पेठ –१०७
सिन्नर –१६०
सुरगाणा –१५९
त्र्यंबकेश्वर –१४
येवला –१३१

