Navi Mumbai Crime : राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याचदरम्यान, नवी मुंबईतील तुर्भे येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारुच्या नशेत एका व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाला आहे.
घटनेच्या रात्री सव्वादहाच्या सुमारास पंडित आपल्या तीन मित्रांसोबत तुर्भे नाका येथील ओव्हरब्रिजखाली बसून दारूचा आस्वाद घेत होता. दारूच्या नशेत असताना पंडितने साथीदारांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून झालेला वाद काही क्षणांतच गंभीर स्वरूपात बदलला. रागाच्या भरात अरुणकुमार भानु राजभर उर्फ आर्यन उर्फ दिपु (वय 20) याने फायबर पाईप आणि बिअरच्या बाटलीने पंडितवर तुफान हल्ला चढवला. मारहाण झाल्याने पंडित जागेवरच कोसळला. त्यानंतर आरोपी आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.
मनोज जरांगेंना संपवण्याचा कट, प्रत्यक्ष धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?
घटनेची माहिती मिळताच तुर्भे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पंडितला जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तुर्भे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आर्यन उर्फ अरुणकुमार भानु राजभर याला अटक केली असून, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
Kolhapur News: ‘सरकार घोटाळेबाजांना अभय देतं…’; कोल्हापुरातून विनायक राऊतांनी महायुती सरकारवर डागली तोफ
या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 726/2025 भा.दं.वि. कलम 103 (1), 3(5) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास तुर्भे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (प्रशासन) गजानन कदम करत असल्याची माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी आज सायंकाळी दिली आहे. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादामुळे एका व्यक्तीचा जीव गमवावा लागल्यानं तुर्भे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

