• Mon. Mar 16th, 2026
    Bachchu Kadu: शेतकरी कर्जमाफी न केल्यास पुन्हा आंदोलन; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

    Bachchu Kadu: शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन करु, असा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला.

    bachchu kadu(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू, असे आश्वासन दिल्याने त्यांना आता मागे फिरता येणार नाही. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास एक जुलैपासून राज्यातील एकही रेल्वे धावू देणार नाही,’ असा इशारा माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गुरुवारी दिला.

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूर येथे आंदोलन उभारल्याबद्दल विविध संघटनांतर्फे शेतकरी नेत्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल पवार, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वराज्य पक्षाचे प्रशांत डिक्कर, वर्धा येथील नीतेश कराळे, शेतकरी नेते अजित नवले, वामनराव चपट उपस्थित होते.
    Maharashtra TimesRaj Thackeray: काम करायची इच्छा नसेल, तर पद सोडा! राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
    सरकारने आम्हाला गृहीत धरू नये. मागणी मान्य न झाल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू. शेतकऱ्यांनी, दिव्यांग बांधवांनी जिवावर बेतणारी आंदोलने केली आहेत. या वेळीही आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. कार्यकर्ते कमी असले, तरी राज्यभरातील सर्व रेल्वे कशा रोखायच्या याचा अभ्यास केला आहे, असा इशारा कडू यांनी दिला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. सरकार उलथवल्याशिवाय शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका जानकर यांनी केली.
    Maharashtra Times’70 हजार कोटी पचवले म्हणून हे पचतील असे समजू नये’, राजू शेट्टी यांचा अजित पवारांवर घणाघात
    बच्चू कडूंनी किती अभ्यास केला? – उच्च न्यायालयाकडून खरडपट्टी

    न्यायालय कधी शेतकऱ्यांसाठी स्वत:हून याचिका दाखल करवून घेत नाही, असे भाष्य करीत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाएल्गार आंदोलन स्थळावरून नाराजी व्यक्त केली होती. या भाष्याची नोंद घेत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी किती याचिका दाखल केल्या? न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने कितीतरी निर्णय दिलेत, त्याचा त्यांनी कधी अभ्यास केला का? असे मौखिक प्रश्‍न उपस्थित करीत उच्च न्यायालयाने त्यांची खरडपट्टी काढली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा