Wardha One Person Dies due to Kite String : वर्धामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर असलेल्या धारदार मांजामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गळा चिरला गेल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष शेलोटे हे बाईक क्र. एम.एच. 32 ए.जी. 4315 या क्रमांकाच्या दुचाकीवरून भिडी जवळील पूलाजवळून जात होते. त्याचवेळी रस्त्यावरुन ओलांडून गेलेल्या नायलॉन मांजाने अचानक त्यांच्या गळ्याला फास बसला. मांजा अतिशय धारदार आणि मजबूत असल्याने त्यांचा गळा चिरला गेला. रक्तस्राव होऊन ते दुचाकीवरून खाली पडले. गळ्यावरील गंभीर जखमेनं काही क्षणातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला. उपस्थितांनी बघतात स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
Mumbai Local : तिघांचा मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती
या घटनेमुळे भिडी परिसरात शोककळा पसरली आहे. नायलॉन मांजावर शासनानं स्पष्ट बंदी घातलेली असतानाही अशा प्राणघातक मांजाचे धागे बाजारात कसे उपलब्ध होतात? याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक निरपराध जीव गमवावे लागत आहेत. भिडी येथील या हृदयद्रावक घटनेमुळे पुन्हा एकदा नायलॉन मांजा बंदीची अंमलबजावणी किती प्रभावी आहे, हा प्रश्न समोर आला आहे.
Accident News : भरधाव बसने बाईकला कट मारला, संतुलन बिघडल्यानं शांताराम काका खाली कोसळले; थोड्याच वेळात…
तीन मित्रांचा जागीच मृत्यू
वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेनरने कारला जबर धडक दिल्यामुळे कारमधील तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबोरबर कारमधील चौथा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. अल्लीपूर-धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळ मंगळवारी दि. 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृत युवकांचे नावे गौरव गावंडे (वय 32) निशांत वैद्य (वय 35) आणि वैभव शिवणकर (वय 28) अशी आहेत.

