• Sun. Jun 14th, 2026
    Wardha News : शेतातून फवारणी आटोपून परतताना वाटेत अनर्थ, नायलॉन मांजा गळ्यात अडकला; कष्टकरी शेतकऱ्याचा जागीच करुण अंत

    Wardha One Person Dies due to Kite String : वर्धामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर असलेल्या धारदार मांजामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गळा चिरला गेल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

    पतंगाच्या दोरीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील भिडी गावाजवळ नायलॉन मांजाने पुन्हा एकदा एका निरपराध व्यक्तीचा बळी घेतला आहे. सुभाष शेलोटे (वय 50) हा शेतकरी आपल्या शेतातील फवारणीचं काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना पतंग खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे गळ्याला फास लागून जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सहा वाजताच्या दरम्यान घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष शेलोटे हे बाईक क्र. एम.एच. 32 ए.जी. 4315 या क्रमांकाच्या दुचाकीवरून भिडी जवळील पूलाजवळून जात होते. त्याचवेळी रस्त्यावरुन ओलांडून गेलेल्या नायलॉन मांजाने अचानक त्यांच्या गळ्याला फास बसला. मांजा अतिशय धारदार आणि मजबूत असल्याने त्यांचा गळा चिरला गेला. रक्तस्राव होऊन ते दुचाकीवरून खाली पडले. गळ्यावरील गंभीर जखमेनं काही क्षणातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला. उपस्थितांनी बघतात स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

    Maharashtra TimesMumbai Local : तिघांचा मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती

    या घटनेमुळे भिडी परिसरात शोककळा पसरली आहे. नायलॉन मांजावर शासनानं स्पष्ट बंदी घातलेली असतानाही अशा प्राणघातक मांजाचे धागे बाजारात कसे उपलब्ध होतात? याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक निरपराध जीव गमवावे लागत आहेत. भिडी येथील या हृदयद्रावक घटनेमुळे पुन्हा एकदा नायलॉन मांजा बंदीची अंमलबजावणी किती प्रभावी आहे, हा प्रश्न समोर आला आहे.

    Maharashtra TimesAccident News : भरधाव बसने बाईकला कट मारला, संतुलन बिघडल्यानं शांताराम काका खाली कोसळले; थोड्याच वेळात…

    तीन मित्रांचा जागीच मृत्यू

    वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेनरने कारला जबर धडक दिल्यामुळे कारमधील तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबोरबर कारमधील चौथा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. अल्लीपूर-धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळ मंगळवारी दि. 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृत युवकांचे नावे गौरव गावंडे (वय 32) निशांत वैद्य (वय 35) आणि वैभव शिवणकर (वय 28) अशी आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा