Nanded News: महायुतीचे मंत्री व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज शरद पवारावर टीका केली आहे, त्यांनी विरोधक पुरावे दाखवत असतील तर निवडणूक आयोगाने यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असंही वक्तव्य केलं आहे.
सत्तेत येऊन आम्हाला काही दिवस झाले आहेत, ज्यांनी पन्नास वर्ष सत्ता भोगली, त्यांनी या गोष्टीचा विचार केला नाही. याच्यापूर्वी शरद पवार यांनी अनेक निवडणुका लढवल्या, सत्तेत येऊन आम्हाला किती वर्ष झाले? त्यांच हे वक्तव्य आश्चर्याची गोष्ट असल्याचं, मंत्री संजय शिरसाट म्हणाले. मंत्री शिरसाट हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray: दुबार-तिबारवाले मतदार आढळल्यास तिथेच फोडून काढा, राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, ‘बडव-बडव बडवायचे आणि…’
सगळे जण जर दुबार मतदाराबाबत पुरावे देत असतील, तर निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, निवडणूक घ्यायची की लांबवायची याबाबतही तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे. लोकांचा आक्रोश असेल, लोकांना वाटत असेल तर मतदार याद्यांची छाननी व्हायला पाहिजे, आमचा विरोध मोर्चालाही नाही, मागणीलाही नाही, निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत, असेही यावेळी शिरसाट म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी एकत्र दिसली, त्यांना शुभेच्छा. निवडणुकीत पाहू, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील नेते एकत्र आल्याबाबत शिरसाठ यांनी दिली. मतचोरांना जरूर धडा शिकवावा, लोकसभेत ज्यांनी मतं चोरली त्यांनाही धडा शिकवा. आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत, मतदारांच्या भरवश्यावर निवडणुका जिंकू, असेही यावेळी मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
“तुम्हा सर्वांनी आज जबरदस्त ताकद दाखवली आहे. लोकशाही, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची ही वेळ आहे. आजच्या एकजुटीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आठवली. संविधानाने लोकशाहीत जो अधिकार दिला आहे, त्याचं रक्षण करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे येत्या काळात आपल्याला सगळं विसरुन एक व्हावं लागेल”, असे आवाहन शरद पवारांनी केले. निवडणूक आयोगाने हे सर्व सिद्ध करुन देण्याचे आवाहन आम्हाला केले होते. ज्यांनी सिद्ध केले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केलेला पाहायला मिळाले.

