Washim Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वाशिममध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पती पत्नीसह एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतक किसन भोकरे व त्याचा सहकारी दुचाकी क्रमांक एम.एच 30 बीजे 5445 गाडी घेऊन अकोला जिल्ह्यातील सावरखेड येथून शेलूबाजारकडे जात होते. समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच 37 एएल 5479 यावर सदाशिव राठोड व त्यांच्या पत्नी सरलाबाई राठोड मंगरूळपीरवरुन मुंबईकडे जात असताना जऊळका येथील चैत्रबन ढाब्याजवळ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली, आणि भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनधारक रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
Raigad News: शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, बड्या नेत्याला एका जुन्या प्रकरणात न्यायालयाकडून सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
रस्त्याने जाणाऱ्या काही प्रवाशांनी अपघाताची माहिती जऊळका पोलिसांना कळविताच जऊळका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता तिघांना मृत घोषित केले तर एकावर गंभीर जखमीवर तात्काळ उपचार सुरू केले आहेत. या अपघातात पती पत्नीचा आणि एका 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास जऊळका पोलीस करत आहे.
‘बॉसला कानशिलात मारा आणि…, मी सुद्धा लोकलने येणार’, राज ठाकरे यांची घोषणा, 1 तारखेच्या मोर्चावर काय-काय म्हणाले?
लेकराच्या तोंडून शेवटचे शब्द ऐकले
जळगाव जिल्ह्यातील अडावदमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वडिलांना मदत करुन ‘जेवणासाठी घरी जातो’, असं सांगून गेलेला लेक पुन्हा घरी परतलाच नाही. घरी जातान वाटेतच टरबूजने भरलेल्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली आल्यानं 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. आकाश ज्ञानेश्वर पाटील (वय 21) असं मृत तरुणाचं नाव आहे. ही घटना चोपडा तालुक्यातील अडावदमध्ये घडली असून आकाशचा मृतदेह बघितल्यानंतर आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

