• Thu. Mar 19th, 2026
    Accident News : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, पती-पत्नीसह एकाचा जागीच अंत; वाहनांचा अक्षरश: चक्काचूर

    Washim Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वाशिममध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पती पत्नीसह एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    वाशिम चैत्रबन ढाबा बाईक्स अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर – संभाजीनगर महामार्गावरील जऊळका गावातील चैत्रबन ढाब्याजवळ आज गुरुवारी रोजी दुपारच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात पती पत्नी आणि एका युवकाचा अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किसन नंदू भोकरे (वय 20, रा. सावरखेड ता. पातूर, जि. अकोला), सदाशिव राठोड आणि सरलाबाई सदाशिव राठोड (दोघे रा. मंगरूळपीर, ता. जि. वाशिम) या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर किसन भोकरे यांच्या दुचाकीवरील साथीदार राजू लठाड (वय 27, रा. कोळदरा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

    मृतक किसन भोकरे व त्याचा सहकारी दुचाकी क्रमांक एम.एच 30 बीजे 5445 गाडी घेऊन अकोला जिल्ह्यातील सावरखेड येथून शेलूबाजारकडे जात होते. समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच 37 एएल 5479 यावर सदाशिव राठोड व त्यांच्या पत्नी सरलाबाई राठोड मंगरूळपीरवरुन मुंबईकडे जात असताना जऊळका येथील चैत्रबन ढाब्याजवळ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली, आणि भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनधारक रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

    Maharashtra TimesRaigad News: शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, बड्या नेत्याला एका जुन्या प्रकरणात न्यायालयाकडून सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

    रस्त्याने जाणाऱ्या काही प्रवाशांनी अपघाताची माहिती जऊळका पोलिसांना कळविताच जऊळका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता तिघांना मृत घोषित केले तर एकावर गंभीर जखमीवर तात्काळ उपचार सुरू केले आहेत. या अपघातात पती पत्नीचा आणि एका 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास जऊळका पोलीस करत आहे.

    Maharashtra Times‘बॉसला कानशिलात मारा आणि…, मी सुद्धा लोकलने येणार’, राज ठाकरे यांची घोषणा, 1 तारखेच्या मोर्चावर काय-काय म्हणाले?

    लेकराच्या तोंडून शेवटचे शब्द ऐकले

    जळगाव जिल्ह्यातील अडावदमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वडिलांना मदत करुन ‘जेवणासाठी घरी जातो’, असं सांगून गेलेला लेक पुन्हा घरी परतलाच नाही. घरी जातान वाटेतच टरबूजने भरलेल्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली आल्यानं 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. आकाश ज्ञानेश्वर पाटील (वय 21) असं मृत तरुणाचं नाव आहे. ही घटना चोपडा तालुक्यातील अडावदमध्ये घडली असून आकाशचा मृतदेह बघितल्यानंतर आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा