मोबाईलवरून झालेल्या वादातून तरूणाची पट्ट्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे घटनेची माहिती देणारा रूम पार्टनरच संशयित आरोपी निघाला आहे. तरूणाच्या हत्येचा गुन्हा अवघ्या दोन तासात उघडकीस आणत लोणंद पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सातारा : खंडाळा तालुक्यातील लोणंदमध्ये 22 वर्षांच्या तरूणाची भिंतीवर डोके आपटून आणि पट्ट्याने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस येताच लोणंदमध्ये खळबळ उडाली. या घटनेचा अवघ्या दोन तासात छडा लावण्यात लोणंद पोलिसांना यश आलं आहे. गणेश संतोष गायकवाड असं मृत तरूणाचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी गावचा रहिवासी आहे. तो सध्या लोणंद येथे वास्तव्यास होता. त्याच्या अल्पवयीन रूम पार्टनरनेच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड हा लोणंद एमआयडीसी परिसरात कामाला आणि माळीआळी परिसरात वास्तव्यास होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित अल्पवयीन मुलगा लोणंद येथे शिक्षण घेत आहे. दोघांची मेसमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर दोघे एकाच खोलीत भाड्याने राहत होते.
अभ्यास आणि मोबाईल वापरावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर गणेश झोपेत असताना रूम पार्टनरने रागाच्या भरात त्याचे डोके भिंतीवर आपटून कमरेच्या पट्ट्याने गळा आवळल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली.
तरूणाच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले. या घटनेची माहिती मृताच्या रूम पार्टनरने दिली असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर त्याच्याच कबुली जबाबातून हत्येचा उलगडा झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, उपनिरीक्षक रोहित हेगडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने हा तपास केला. ‘दोन-चार मंत्र्यांना कापा’, बच्चू कडूंच्या मोर्चात रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त वक्तव्य तरुणाच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन संशयिताला बाल न्यायालयात हजर केलं होतं. त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. या घटनेच्या तपासासाठी उद्या पुन्हा त्याची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा तपा अधिकारी सुशील भोसले यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा