• Thu. Jun 18th, 2026
    Solapur News: द्राक्षबाग उद्ध्वस्त झालेल्या ‘त्या’ शेतकरी महिलेला आमदारपुत्राची भेट, शेतकरी महिलेचा पुन्हा टाहो

    Barshi farmer update: बार्शीमधील कोरफळे या गावातल्या किरण बर्डे यांच्या उद्ध्वस्त झालेल्या द्राक्ष बागेला रणवीर राऊतांनी भेट दिली व त्यांना दिलासा दिला आहे. यावेळी किरण यांनी पुन्हा टाहो फोडला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर , इरफान शेख: बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत तालुक्यात नेहमी चर्चेत राहतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता रणवीर राऊतांनी नुकतीच त्यांच्या मतदारसंघातील शेतकरी महिलेला दिलासा देण्यासाठी भेट घेतली आहे. या भेटीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, बार्शी तालुक्यातील कोरफळे गावातील किरण बर्डे या महिला शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत अज्ञात इसमाने विषारी औषध फवारणी करून मोठे नुकसान केले होते. किरण बर्डे या शेतकरी महिलेचा काळीज पिळटवून टाकणारा आक्रोश सोशल मीडियावर वायरल झाल्याने संताप व्यक्त केला गेला. सर्वच स्तरातून नागरिकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
    Maharashtra Timesठाकरे बंधूंच्या युतीमुळे एकनाथ शिंदेंना ‘सरप्राइज लॉटरी’? BMC निवडणुकीत होऊ शकतो मोठा फायदा, कारण…
    बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांनी संबंधित महिलेची भेट घेऊन तिला दिलासा दिला आहे. आमदार पुत्र रणवीर राऊत नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात. शेतकरी महिलेला धीर देतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. कर्ज काढून द्राक्ष बाग फुलवली अन् अज्ञात इसमानं विषारी औषध फवारणी करुन आयुष्य उध्वस्त केले,असा हंबरडा फोडत संबंधित महिलेने रणवीर राऊत यांच्यासमोर दुःख व्यक्त केले आहे.

    हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

    शेतकरी महिलेचे काळीज पिळटवून टाकणारा आक्रोश
    बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अनिता किरण बर्डे या परिश्रमी शेतकऱ्याच्या द्राक्षबागेवर अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक गळून पडल्याने बर्डे कुटुंब हतबल झाले आहे. अनिता किरण बर्डे उध्वस्त झालेल्या द्राक्ष बागेत आक्रोश व्यक्त करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.

    “सोयाबीनची होळी करत सरकारच्या नावाने शिमगा” करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!

    बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारकडून जाहीर करण्यात आलेली केवळ ८५ रुपये प्रति गुंठा इतकी मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, बागायती शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, तसेच सोयाबीनची हमीभावाने खरेदी आणि भावांतर योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “सोयाबीनची होळी करत सरकारच्या नावाने शिमगा” करून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. बीडचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा