Panvel dead bodies swap: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला. दोन मृतदेहांची अदलाबदल झाली. एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
हा प्रकार पनवेल उपजिल्हा रुग्णालयात घडला असून येथे मृतदेहांची अदलाबदल झाली आणि या प्रकरणामुळे दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला आहे. हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा सुशांत मल्लम यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात त्याचा मृतदेह घेण्यास पोहचले. त्यावेळी तो मृतदेह त्यांच्या मुलाचा नसल्याचे स्पष्ट झाले. तपासाअंती कळले की सुशांतचा मृतदेह बिष्णा रावत यांच्या नातेवाईकांनी नेला होता आणि त्यांनी त्याचे अंत्यसंस्कारही देखील करून घेतले.
माझं तुझ्यावर प्रेम; 28 वर्षीय राजेंद्र तरुणीच्या घरात घुसला, जवळीक साधली अन्…; नवी मुंबईत खळबळजनक घटना
आरोग्य अधिकारी अशोक गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर येथे राहणारा सुशांत मल्ला एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याने २0 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी खारघर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. त्याच दिवशी न्यू पनवेल परिसरात बिष्षा रावत नावाच्या एका सुरक्षा रक्षकाने देखील आत्महत्या केली होती. यानंतर या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. दोघेही नेपाळचे असल्यामुळे, दोघांच्या म़तदेहांची अदलाबदली झाली.
यावेळी दोघांच्याही कुटुंबियांना रुग्णालयात बोलावण्यात आले होते. रावत परिवाराला व्हिडिओद्वारे मृतदेहाची ओळख पटवून सुशांत मल्लम यांचे मृतदेह दाखवले रावत परिवाराने कोणतीही तक्रार न करता ते मृतदहाची ओळख पटवली आणि पाठवण्यास सांगितले.त्याचबरोबर त्यांनी लगेच मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. सुशांत चा परिवार मुळचा नेपाळचा असल्यामुळे, त्यांनी पनवेलमध्ये पोहचायला 4 दिवस गेले. रुग्णालयात पोहचताच त्यांनी मृतदेह सुशांतचे नसल्याचे सांगितले. या नंतर रुग्णालयात गोंधळ उडाला आणि तपास केल्यावर म़तदेह बदले असल्याचे समोर आले. यानंतर दोन्ही परिवारांमध्ये
पनवेलमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, एकाचा मृत्यू, 4 जण रुग्णालयात दाखल
सुशांत मल्लम यांचे नातेवाईक नेपाळमध्ये असल्याने चार दिवसांनी ते रुग्णालयात पोहोचले आणि मृतदेह ओळखण्यास नकार दिला. दोन्ही कुटुंबे नेपाळमधील असल्याने आणि दोन्ही घटनाही एकाच दिवशी घडल्याने रुग्णालय प्रशासनाकडून ही चूक झाली. नंतर रुग्णालय प्रशासनाने दोन्ही कुटुंबांना बोलावून समजुतीने तोडगा काढला. अखेर दोन्ही कुटुंबे एकत्र येऊन उरलेल्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले आणि मृतदेह घेऊन गेली.

