Devendra Fadnavis: नागपूर विमानतळाचा विकास रखडण्यामागे अनेक गोष्टी होत्या. त्या दूर झाल्या आहेत. विमानतळ जीएमआरकडे हस्तांतरित करण्याचा अध्यादेश पंधरा दिवसांत काढला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी रामगिरी येथे पत्रकारांशी संवाद साधला. माओवाद संपविण्यापासून तर विकासाच्या भरारीपर्यंत सगळ्याच प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर नागपूर लॉजिस्टिक हब होईल असा दावा केला जात होता. ती वेळ आली आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात भव्य असा लॉजिस्टिक हब नागपुरात उभा राहणार आहे. महिनाभरात त्याचे भूमिपूजन होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य: ‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’
हिंगणा तालुक्यात उभे होणारे नवे नागपूर प्रत्यक्षात बिझनेस डिस्ट्रिक्ट संकल्पनेवर आधारित आहे. नवे उद्योग येतात तेव्हा त्यांना सगळ्या सुविधा हव्या असतात. त्या तिथे मिळतील. या प्रकल्पातील ९० टक्के अडचणी दूर झाल्या आहेत, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील बीकेसीची जागा छोटी असली तरीही तेथून तीन टक्के जीडीपी मिळतो. तसेच इथून व्हावे, ही अपेक्षा आहे. नागपुरातील नव्या विधानभवनाच्या निर्मितीस येत्या काळात चार महिन्यात प्रारंभ होईल.
गडचिरोलीतील जीएसडब्ल्यू प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या जागांपैकी बव्हंशी जागा ही शेतीची असल्याचे लक्षात आले. त्यांना नऊ हजार एकर जागा हवी आहे. आता कंपनी आणि शेतकरी थेट बोलतील आणि हा विषय संपेल. नळगंगा, वैनगंगा प्रकल्पाचे काम डिसेंबरमध्ये सुरू होणे कठीण आहे. मात्र भूसंपादनाच्या कामास मार्चपासून प्रारंभ होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारकडून आमदारांच्या निधीवाटपात दुजाभाव? विजय वडेट्टीवार यांचा धक्कादायक आरोप
माओवाद संपण्याच्या वाटेवर
शहरी माओवादी ही चेहराविरहित संघटना आहे. त्यांची प्राथमिक कार्यपद्धती तरुण पिढीच्या मनात विष पेरण्याचे काम करते, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी माओवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. शहरी माओवाद हे राज्य आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान आहे. नवीन पिढीची दिशाभूल केली जात आहे. त्यांना घटनात्मक मूल्यांविरोधात भडकविले जात आहे. कोणत्याही संविधानविरोधी कृतीला घटनात्मक मार्गाने उत्तर दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले. जनसुरक्षा कायदा राष्ट्रपतींच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात दहापेक्षा कमी माओवादी सक्रिय असून ही समस्या पूर्ण निर्मूलनाच्या वाटेवर आहे, असेही त्यांनी सांगितले.
’10 लाख घरं दिली, 60 वसतिगृह सुरु केली’; ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही; म्हणाले, ‘मराठा समाजाला…’
पुरणपोळी नव्हे, डार्क चॉकलेट
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता यांनी सांगितलेला पुरणपोळीचा किस्सा यावेळी निघाला. त्यावर फडणवीस म्हणाले की, ‘मला पुरणपोळी आवडत नाही. आता मला डार्क चॉकलेट आवडते.
शक्तिपीठामध्ये बदल
महाराष्ट्रात तयार होत असलेल्या शक्तिपीठ महामार्गास धाराशिवपर्यंत विरोध नाही. त्यापुढेही शेतकऱ्यांचा विरोध नाही, काही नेत्यांचा आहे. त्यामुळे काही ठिकाणी महामार्गात बदल होण्याची शक्यता आहे. तो चंदगडमधून जाऊ शकतो. सोलापूर, सांगली भागात अलाइनमेंटमध्ये बदल होऊ शकतात, असे फडणवीस म्हणाले. गडचिरोलीला जाणाऱ्या विस्तारित समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन झाले नव्हते, त्याचप्रमाणे निविदामध्ये खूपच अवास्तव दर प्रस्तावित करण्यात आले होते, त्यामुळे निविदा रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

