• Fri. Mar 6th, 2026

    बॉयफ्रेंडच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणीने प्राण सोडले; एका शंकेनं घेतला दोघांचा जीव

    बॉयफ्रेंडच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणीने प्राण सोडले; एका शंकेनं घेतला दोघांचा जीव

    Mumbai Crime News: मुंबईत प्रियकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. प्रियकराने मनिषावर चाकूने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर सोनूने स्वतःचे जीवन संपवले. तर गंभीर जखमी झालेल्या मनिषावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

    बॉयफ्रेंडच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीने प्राण सोडले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: प्रियकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मनिषा यादव असं मृत तरुणीचं नाव आहे. आज सकाळच्या सुमारास मनिषा हिच्यावर तिचा प्रियकर सोनू बराय याने हल्ला केला होता. मनिषावर हल्ला केल्यानंतर सोनूने स्वत:चं जीवन संपवलं होतं. गंभीर जखमी झालेल्या मनिषाला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मनिषाची प्राणज्योत मालवली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लालबाग काळाचौकी परिसरात मनिषा यादव हिला सोनू बराय याने रस्त्यात बेदम मारहाण करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मनिषा जवळच असलेल्या आस्था नर्सिग होममध्ये गेली. मात्र सोनू याने नर्सिंग होममध्ये घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि नंतर स्वतःचाही गळा चिरला. या घटनेनंतर या दोघांना तात्काळ केईएम रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. परंतु तिथे तपासून डॉक्टरांनी सोनू बराय याला मृत घोषित केले.

    Maharashtra TimesSatara Crime : ‘शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी वारंवार दबाव’, मृत डॉक्टरच्या नातेवाईकांचा मोठा आरोप; ‘त्या’ खासदाराचा सतत फोन

    दुसरीकडे, मनिषा यादव हिच्यावर नंतर जे जे रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. चाकूने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनिषाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे तिची प्रकृती अत्यवस्थ होती. सायंकाळच्या सुमारास दुर्दैवाने तिने प्राण गमावले.

    कोणत्या कारणातून केला जीवघेणा हल्ला?

    आंबेवाडी येथे राहणारा सोनू बराय या 24 वर्षीय तरुणाचे याच परिसरात राहणाऱ्या मनिषासोबत प्रेमसंबंध होते. मात्र आठ दिवसांपूर्वी मनिषाचे अन्य कुणासोबत अफेयर असल्याचा संशयावरून दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचं सांगण्यात येत आहे. ब्रेकअप झाल्यानंतर सोनू मानसिक तणावात होता. याच तणावात असताना त्याने सकाळी मनिषाला भेटायला बोलावून तिच्यासोबत वाद घातला आणि नंतर तिच्यावर चाकूने वार केले. तसंच स्वतःचाही गळा चिरून घेतला.

    दरम्यान, या घटनेनंतर काळाचौकी पोलिस आणि उपायुक्त घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा