• Sun. Mar 8th, 2026
    40 वर्षांनी बाळासाहेब ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीला यश; केंद्र सरकारने दिली मंजूरी, महाराष्ट्रातल्या….

    Islampur city name change: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर होणार आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिली आहे. गेली अनेक वर्षे ही मागणी जोर धरत होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सांगलीमधील इस्लामपूर शहराचं नामांतर सध्या चर्चेत आलं आहे. या शहराच्या नामांतराला आता केंद्र सरकारनेही हिरवा झेंडा दाखवला आहे. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकने राज्य सरकारला यासंबधीतचे अधिकृत मान्यतेचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आता या शहराचे नाव अधिकृतपणे ईश्वरपूर असणार आहे. काही दिवसांआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाबद्दल विधानसभेमध्ये माहिती दिली होती.

    विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर आता राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. सगळीकडे कागदोपत्री व्यवहारांमध्येही आता इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर केलं जाणार आहे. राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाने आवश्यक कागदपत्रे, प्रस्ताव आणि स्थानिक शिफारशीसह नामांतराचा हा अहवाल तयार करून पाठविला होता. दरम्यान, मान्यता मिळाल्यामुळे आता महाराष्ट्र सरकार पुढील प्रशासकीय कारवाई तथा अंमलबजावणी करण्यास सुरुवात करणार आहे.
    Maharashtra TimesJalna News: जालन्यात प्रसिद्ध उद्योगपतीच्या पुतण्याची गाडी अडवून जीवघेणा हल्ला, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
    महायुती सरकारने याआधीही राज्यातील अनेक शहरांची नावे बदलली आहेत. राज्यात उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन शहरांची नावं बदलल्यानंतर आता इस्लामपूरचेही नाव बदलले जाणार आहे. त्यामुळे या यादीत एका नावाची भर पडली आहे.

    गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामपूरचे नाव बदलावे अशी मागणी स्थानिक करत होते. सर्वप्रथम या नामांतराची ही मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पंत सबनीस यांनी 1970 मध्ये केली होती. त्यांच्या मते शहराचे नाव भारतीय संस्कृती आणि धार्मिक वारशाबरोबर सुसंगत असले पाहिजे असे होते. त्यानंतर पुढे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराच्या नामांतराची मागणी जाहीर सभेतून केली होती.

    हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

    1986 मध्ये त्यांची शहराच्या यलाम्मा चौकात सभा झाली होती. तिथे भाषणात हे इस्लामपूर नव्हे तर ईश्वरपूर आहे, असा उच्चार त्यांनी केला होता. त्यानंतर या विषयाला पुढे अनेक वर्ष स्थानिक नागरिक, संस्था, आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. अखेर आज शहराच्या नामांतरचा मार्ग मोकळा झाला आहे. हे नामांतर होत असल्याने ज्यांची नामांतराची मागणी होती त्या सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे, काही ठिकाणी लोकांनी फटाकेही फोडले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा