Islampur city name change: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर होणार आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिली आहे. गेली अनेक वर्षे ही मागणी जोर धरत होती.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर आता राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. सगळीकडे कागदोपत्री व्यवहारांमध्येही आता इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर केलं जाणार आहे. राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाने आवश्यक कागदपत्रे, प्रस्ताव आणि स्थानिक शिफारशीसह नामांतराचा हा अहवाल तयार करून पाठविला होता. दरम्यान, मान्यता मिळाल्यामुळे आता महाराष्ट्र सरकार पुढील प्रशासकीय कारवाई तथा अंमलबजावणी करण्यास सुरुवात करणार आहे.
Jalna News: जालन्यात प्रसिद्ध उद्योगपतीच्या पुतण्याची गाडी अडवून जीवघेणा हल्ला, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
महायुती सरकारने याआधीही राज्यातील अनेक शहरांची नावे बदलली आहेत. राज्यात उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन शहरांची नावं बदलल्यानंतर आता इस्लामपूरचेही नाव बदलले जाणार आहे. त्यामुळे या यादीत एका नावाची भर पडली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामपूरचे नाव बदलावे अशी मागणी स्थानिक करत होते. सर्वप्रथम या नामांतराची ही मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पंत सबनीस यांनी 1970 मध्ये केली होती. त्यांच्या मते शहराचे नाव भारतीय संस्कृती आणि धार्मिक वारशाबरोबर सुसंगत असले पाहिजे असे होते. त्यानंतर पुढे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराच्या नामांतराची मागणी जाहीर सभेतून केली होती.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
1986 मध्ये त्यांची शहराच्या यलाम्मा चौकात सभा झाली होती. तिथे भाषणात हे इस्लामपूर नव्हे तर ईश्वरपूर आहे, असा उच्चार त्यांनी केला होता. त्यानंतर या विषयाला पुढे अनेक वर्ष स्थानिक नागरिक, संस्था, आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. अखेर आज शहराच्या नामांतरचा मार्ग मोकळा झाला आहे. हे नामांतर होत असल्याने ज्यांची नामांतराची मागणी होती त्या सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे, काही ठिकाणी लोकांनी फटाकेही फोडले आहेत.

