• Sat. Mar 7th, 2026

    Accident News : वाहनात बिघाड झाल्यानं रस्त्याच्या कडेला थांबले, तिथेच काळ आडवा, भरधाव ट्रकने चिरडलं; दाम्पत्यासह तिघांचा अंत

    Accident News : वाहनात बिघाड झाल्यानं रस्त्याच्या कडेला थांबले, तिथेच काळ आडवा, भरधाव ट्रकने चिरडलं; दाम्पत्यासह तिघांचा अंत

    Yavatmal Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दाम्पत्यासह एकाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

    यवतमाळ अपघात बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : वाहनात बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात एका दाम्पत्यासह तिघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. दिवाळीच्या दिवशी म्हणजे काल मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू परिसरातील पैलपाडा गावाजवळ हा भीषण अपघात घडला.

    बोरगाव मंजू येथील धीरज शाळीग्राम सिरसाठ (वय 35) आणि त्यांची पत्नी अश्विनी (वय 30) हे दोघेही दुकानाचे सामान घेऊन ‘छोटा हत्ती’ने मंगळवारी रात्री कारंजा तालुक्यातील खेर्डा येथे जात होते. पैलपाडा गावाजवळ त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने गावाकडे परत जाण्यासाठी त्यांनी दुसरे वाहन बोलविले. आरिफ खान अहमद खान (वय 28) व अन्वर खान अब्दुल खान (वय 25) हे दोघेही तातडीने वाहन घेऊन पैलपाडा गावाजवळ पोहोचले. यानंतर चौघेही नादुरुस्त वाहनाची पाहणी करीत रस्त्याच्या कडेला उभे असताना मूर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाने त्यांना धडक दिली.

    Maharashtra Timesआईचा आक्रोश, बिबट्याची माघार; शेपटी पकडली अन् लेकरासाठी ‘ती’ बिबट्याशी भिडली! नेमकं काय घडलं?

    या भीषण अपघातात धीरज, अश्विनी व आरिफ खान यांचा जागीच मृत्यू तर अन्वर खान हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून महामार्गावरील सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.

    दिवाळीच्या दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

    देशभरात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असतानाच यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या झाल्याचे सोमवारी समोर आले. कळंब, बाभूळगाव आणि दारव्हा तालुक्यातील या घटनांमुळे शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Maharashtra TimesVasai Fort Video : शिवरायांच्या पोशाखात आलेल्या तरुणाला हटकलं, हिंदी सुरक्षा रक्षकाचं कृत्य, ‘हिंदीतून बोला’ म्हणत माज, युवकाने काय केलं?

    कळंब तालुक्यातील तिरझडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष वसंत ठुसे (३५) यांनी १८ ऑक्टोबरला सायंकाळी गावातीलच ग्रामपंचायतीच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. त्यांच्यावर बँकांचे कर्ज वाढत असल्याने ते सतत काळजीत राहत होते. यातच त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा