राज्यभरात दिवाळीचा मोठा उत्साह आहे. मुंबईसह उपनगरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दिवाळीत बाजारपेठा लोकांच्या खरेदीने फुलल्या असून दिवाळीचा आनंद साजरा केला जात आहे. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काळी दिवाळी साजरी करत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप केला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे न आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
