• Sun. Mar 8th, 2026
    बैलांना चारण्यासाठी शेतात सोडलं, परत नेण्यासाठी गेले पण पुन्हा आले नाही; अख्खं गाव शेतात गेलं अन् समोरचं दृश्य बघून हादरलं

    Chandrapur Farmer Killed in Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका शेतकऱ्यावर शेतात वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार झाला आहे. या घटनेमुळे शेतकरी आता शेतात जाण्यासही घाबरत आहेत.

    वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश झाडे, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची थरकाप उडवणारी घटना पुढे आली आहे. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेकपिपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला केला. वाघाने त्यांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे शेत परिसरात विखुरलेल्या अवस्थेत सापडले. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी भाऊजी पाल नेहमीप्रमाणे आपल्या बैलांना शेतात घेऊन गेले. त्यांनी बैलांना चारण्यासाठी मोकळं सोडलं आणि घरी परत आले. सायंकाळी ते बैलांना परत आणण्यासाठी शेताकडे गेले. मात्र, रात्र झाली ती ते पुन्हा घरी परतले नाही. कुटुंबीयांना चिंता वाटली. त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेत शोधाशोध केली. पण त्यांचा शोध लागला नाही. काल रविवारी कुटुंबीयासह गावकऱ्यांनी शोधमोहीम पुन्हा सुरू केली. यावेळी शेताच्या परिसरात भीषण दृश्य दिसलं. भाऊजी पाल यांच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले होते आणि ते तुकडे विविध ठिकाणी विखुरलेले होते. हे दृश्य बघताच गावकरी हादरले.

    Maharashtra Timesमोठी बातमी: शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणावरून खळबळ, पोलिसांनी उचललं पहिलं पाऊल

    त्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी मृतदेहाचे तुकडे गोळा केली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून अशा प्रकारे शरीराचे तुकडे विखुरले जाण्याची घटना या भागात पहिल्यांदाच घडली आहे. सदर परिसरात वनविभागाने पथक तैनात केलं आहे. वाघाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिसरातील गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गोंडपिपरी तालुक्यात याआधी वाघाच्या हल्ल्याची अशी घटना समोर आली नव्हती. मात्र, आता या घटनेनंतर शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    Maharashtra Timesपुण्यातून मराठवाड्यात जाण्यासाठी दिवाळी विशेष रेल्वे; नांदेड-हडपसर ट्रेनमुळे प्रवाशांना फायदा, कोणत्या स्थानकांत थांबे?

    अनेक गावांमध्ये शेतकरी शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत. सध्या सोयाबीन, कापूस, धान शेतात उभं आहे. शेतकऱ्यांना शेतात रोजच जावं लागतं. ही घटना घडल्यानं शेतात काम करायला शेतमजूर घाबरत आहेत. जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गोंडपिपरीसारख्या ग्रामीण भागात बऱ्याच वर्षांपासून वाघाच्या घटना घडलेल्या नव्हत्या. या घटनेमुळे शेतकरी समुदाय अस्वस्थ झाला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा