Ghodbunder Road Accident: ठाण्यात घोडबंदर परिसरात एका भीषण अपघातात ४० वर्षीय स्वाती कदम यांचा मृत्यू झाला. कामावरून घरी परत जात असताना एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सलून मालक मनोज ठाकूर जखमी झाले असून, स्वाती यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सलूनमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असल्याने स्वाती उशिरा घरी निघाली. सलूनचे मालक मनोज ठाकूर यांनी उशीर झाल्यामुळे स्वातीला आपल्या दुचाकीवरून सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास, घोडबंदरहून ठाणेच्या दिशेने जात असताना, एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
Thane News : ‘आता वेळ आली, या कार्यसम्राटांना फाटकी शाल अन्…’ भाजपच्या बॅनरची चर्चा, शिंदेंच्या सेनेला डिवचलं
या अपघातात मनोज ठाकूर यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून स्वाती कदम यांना डोक्यावर गंभीर जखम झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी स्वातीला मृत घोषित केले. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कसारवडावली पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले की, “अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.” स्वाती कदम या मूळच्या ठाण्यातील असून गेल्या काही दिवसांपासून नागलबंदर परिसरात नोकरीसाठी राहत होत्या. केवळ काही दिवसांपूर्वीच त्यांनी नवीन सलूनमध्ये काम सुरू केले होते. दुर्दैवाने, त्या नोकरीच्या केवळ आठव्या दिवशीच एका वेगवान वाहनाने त्यांचे आयुष्य संपवले.
कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला
याच प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये घडली होती. शनिवारी (18 ऑक्टोबर 2025) महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात एका वेगाने मिनीट्रक खोड्यावरून घसरल्याने किमान आठ जणांची मृत्यू झाली आणि १५ जण जखमी झाले, पोलिसांनी सांगितले. हा अपघात सकाळी सुमारे 10.30 वाजता तालोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदसैली घाट विभागात घडला. अंदाजे 40 जण मिनी ट्रकवरून एक धार्मिक स्थळावरून परतताना ड्रायव्हरने वाहनावर नियंत्रण हरवलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

