Ghatkopar illegal immigrants : मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. घाटकोपर रेल्वे परिसरात ही कारवाई झाली.
मुंबई शहर हे स्वपांचे शहर मानले जाते. देशातून अनेक नागरिक मुंबईमध्ये वास्तव्याला येतात. या शहरात नोकऱ्या, व्यवसाय करण्यासाठी दररोज लोंढेच्या लोंढे दाखल होत असतात. त्याचवेळी अवैध मार्गाने बांगलादेशी नागरिकही भारतात दाखल होत आहेत, अशा प्रकारची माहिती समोर आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, सगळ्यांचेच नागरिकत्व तपासणे कोणत्याही प्रशासकीय संस्थेला अतिशय कठीण आहे, पण काही तपासयंत्रणा सक्रीय असल्याने व बांगलादेशी नागरिकांच्या अवैध घुसखोरीचा प्रश्न गंभीर बनत असल्याने या प्रकरणांवर सध्या सरकार सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीरपणे काम करत आहे.
बुलढाण्यात भाजप- शिंदे गटात युती होणार की नाही? डिफेंडर कारवरुन तापलं वातावरण: आमदार संजय गायकवाड भाजप नेत्याला भिडले, म्हणाले….
कशी केली कारवाई ?
अवैध घुसखोरीच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. या पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक रेवणसिद्ध ठेंगळे आहेत. दरम्यान, त्यांना घाटकोपर रेल्वे परिसरात ५ अवैध बांगलादेशी नागरिक दाखल होत असल्याची माहिती मिळाली. यावेळी निरीक्षकांनी तात्काळ संपूर्ण पथकाला कामाला लावले. पथकाने घटनास्थळी पोहेचल्यावर या व्यक्तींची चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीअंती या 5 नागरिकांनी स्वतः बांगलादेशी असल्याची कबुली दिली.या चौकशीदरम्यान, नागरिकांनी त्यांच्या इतर नातेवाईकांबद्दलही माहिती दिली जे मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यानंतर नवी मुंबई परिसरात राहणारे परी सरदार, जरीना मुल्ला, रकीब मु्ल्ला, जहांआरा शेख, इकबाल शेख यांस पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, ते सर्व अवैध मार्गाने भारतात प्रवेश करुन मुंबईत पोहोचल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, हे विशेष पथक गेल्या काही महिन्यांपासून अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सातत्याने कारवाई करत आहे. या काळामध्ये 100हून अधिक बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशिर कारवाईही करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली आहे. तसेच अवैध घुसखोरी टाळणं अत्यंत महत्वाचं आहे, त्यासाठी अशा प्रकारच्या कारवायाही महत्वाच्या आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मूळ रहिवासी व कामगारांची संख्या वाढते आहे. त्यामुळे अवैध प्रवेश करुन आलेल्या नागरिकांमुळे स्थानिकांना समस्या निर्माण होऊ शकतात, असे मतही पोलिस निरीक्षक रेवणसिद्ध ठेंगळे यांनी व्यक्त केले आहे.
सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या डोळ्यात अश्रू!
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या बांगलादेशी नागरिकांना लवकरच देशाबाहेर पाठवले जाईल, त्याचवेळी भविष्यात अशा प्रकारच्या घुसखोरी रोखण्यासाठी मुंबई पोलिस संबंधित विभागांशी समन्वय साधून कारवाईसाठी सज्ज आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांची सुरक्षा महत्वाची असून अशा प्रकारची माहिती मिळाल्यास पोलिसांना तात्काळ सूचित करण्यात यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

