Nanded Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. वडिलांच्या डोळ्यादेखत आपल्या लेकांचा मृत्यू झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील रामराव देगुरे हे शिक्षक आहेत. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला मुलगा मनोज देगुरे याच्या विवाहासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील स्थळ आलं होते. देगुरे कुटुंबीय आणि त्यांच्या मुली, जावई आणि इतर नातेवाईक चारचाकी वाहणानं जात होते. हदगाव शहरापासून आठ किलोमीटर दूर असलेल्या तुळजापूर-नागपूर या राष्ट्रीय महार्गावरील भानेगाव येथे रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरु आहे. रस्त्यावर जेसीबी थांबलेलं होतं. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने जेसीबीला जोरदार धडक दिली. त्यापाठोपाठ चारचाकी वाहन आयशरला धडकलं. हा तिहेरी अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहनाचा आणि आयशर ट्रकचा चुराडा झाला. शिवाय चालकाच्या बाजूला बसलेल्या मनोज देगुरे आणि मंजुशा अहिनवार या बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण कारमध्ये अडकले होते.
Nandurbar Accident : यात्रेहून परतताना मोठा अनर्थ, घाटात वाहन उलटून भाविकांचा अंत; एकाच गावातील पाच तरुणांचा मृत्यू
या अपघातात पियुष देविदास अहिनवार (वय 11), मनिषा निळकंठ राशेवाढ (वय 32, रा. सय्यदपूर ता. अहमदपूर जि. लातूर) हे गंभीर जखमी आहेत. रामराव शंकर देगुरे (वय 60), प्रतिभा उर्फ बेबी रामराव देगुरे (वय 55), चालक दत्तात्रेय अंकुटे (वय 25), निधी राशेवाढ (वय 14) आणि शरयू राशेवाढ (वय 8 वर्ष) यांचाही जखमींमध्ये समावेश आहे. तसेच आयशर ट्रकचालक शाहरुख खान (वय 34 रा. खंडवा, मध्य प्रदेश) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती कळताच जखमींना उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रवाना केलं. डोळ्यादेखत मुलाचा आणि मुलीचा मृत्यू झाल्यानं देगुरे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आई…थांब मी आलो; पार्थ धावत बसपाशी आला, पण माऊलीच्या लक्षात आलं नाही अन् क्षणात सगळं संपलं! बसखाली चिरडून…
मागील अनेक दिवसांपासून या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीचं काम सुरु आहे. विशेष म्हणजे महामार्गाच्या डागडुजीचं काम चालू असताना फलक लावणं तसेच वाहनासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था असणं गरजेचं होतं. परंतु संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली नाही, त्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे.

