Ambadas danve on sandipan bhumre: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) तर्फे हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चावर शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी टीका केली होती, या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
संदीपान भुमरेंचं वक्तव्य
उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चा हे राजकारण आहे, या शब्दात संदीपान भुमरेंनी टीका केली आहे. शेतकऱ्यांना मदत केली जात असतांनाही मोर्चा काढणे चुकीचे आहे, असं भुमरेंचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंना शेतकरी माफ करणार नाहीत. असं ते म्हणाले आहेत. “शेतकऱ्यांना मदत जर झाली नसती तर मग उद्धव ठाकरेंनी मोर्चे काढले असते तर समजू शकलो असतो, पण जर समजा मदत करुन हा मोर्चा काढायचा, यामागे एकच कारण आहे ते म्हणजे राजकारण. पंचायत समिती, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा मोर्चा काढला जात आहे.”
PM Modi: सरकारचा बळीराजासाठी 42000 कोटींचा दिवाळी बोनस; शेतकऱ्यांसाठी खास योजनेची घोषणा; नेमकी स्किम काय?
अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
भुमरेंच्या या टीकेला उबाठाचे नेते अंबादास दानवेंनी ट्वीट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी संदीपान भुमरेंच्या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरेंचं सहकार्य किती राहिलं आहे, हेच अधोरेखीत केलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करताना संदीपान भुमरे यांनी हे ध्यानी घ्यावं की, ध्यानीमनी नसताना आपल्याला कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देणारे उद्धव साहेब ठाकरे हेच होते.
गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने नवरात्रीनिमित्त कन्या पूजन कसं केलं?
‘कशाला अधिक बोलायला लावता?’
कोविडचे बलशाली संकट राज्यावर असताना उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडून आपल्या रोजगार हमी खात्याचा रुपयाही निधी कपात करण्यात आला नव्हता. २०१९ पर्यंत आपण जो निवडणूक उमेदवारी अर्ज भरून आमदार झालात, त्या फॉर्मवर उद्धव ठाकरे साहेबांचीच सही होती. आपले सुपुत्र जिल्हापरिषद सदस्य, सभापती झाले ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याच पक्षाकडून झाले होते. आपला स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट हा प्रवास सर्वश्रुत आहे. कशाला अधिक बोलायला लावता? दानत आणि हिम्मत असेल तर सरकारला कर्जमुक्ती देण्यासाठी आपण भाग पाडाल! जे तुमच्या आवाक्याबाहेर आहे..

