Latur Accident : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच आता लातूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता सख्ख्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका चारचाकी वाहनाने यांच्या दुचाकीला धडक दिली. खाली कोसळताच एका ट्रकने त्यांना चिरडलं, यात दोघांचा करुण अंत झाला. एकाचवेळी आपले दोन्ही मुलं गेल्यानं आई-वडिलांनी एकच टाहो फोडला.
हा भीषण अपघात औसा शहरातील पोतदार शाळेसमोर घडला. बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी भाऊ प्रसाद शिंदे आणि गायत्री शिंदे हे दुचाकीवरून लातूरकडे निघाले होते. दरम्यान, भरधाव बोलेरो गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामुळे दोघे रस्त्यावर पडले आणि त्याचक्षणी बाजूने जाणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडलं. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Wardha News : व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले, तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज; अखेर…
अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. औसा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. या घटनेत वाघोली येथील रहिवासी पद्माकर शिंदे यांचा मुलगा प्रसाद आणि मुलगी गायत्री यांचा मृत्यू झाला. पद्माकर शिंदे हे शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. मुलगी गायत्री ही लातूरमध्ये शिक्षण घेत होती, तर प्रसाद वडिलांना शेती आणि दुधाच्या कामात मदत करत होता. आज सकाळी बहिणीला लातूरला कॉलेजसाठी सोडायला जाताना ही दुर्दैवी घटना घडली. बहिणीला सोडायला जाताना प्रसादने आपल्या आईचा निरोपही घेतला होता. पद्माकर शिंदे यांची ही दोनच अपत्यं असल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची बातमी समजताच वाघोली गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
‘पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही’, 80 वर्षाच्या आजीची सरकारकडे याचना, नृत्यांगना सायली पाटली मदतीला धावली
पुण्यातील नवविवाहित तरुणाचा करुण अंत, पत्नीचा टाहो
दसरा आनंदाने साजरा झाला, दिवाळीचे वेध लागले, मात्र त्याआधीच सरोदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पुण्यातील 24 वर्षीय तरुणाचा बाईक अपघातात मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द परिसरात घडलेल्या एका दुर्घटनेने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. संसार फुलण्याआधीच कोमेजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

