• Sun. Mar 8th, 2026
    राज्यात अतिवृष्टीचं संकट, राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी किती कोटींचं पॅकेज; कुणाकुणाला मदत मिळणार?

    Devendra Fadnavis Announce Packet 31 Thousand 628 Crore for Farmers : यंदाच्या पावसाता ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि घराचं नुकसान झालं आहे. त्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर केली आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, ते बघून घेऊया.

    राज्य सरकारची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : यंदा राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीचं संकंट आलं. अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालं, उभी पीकं आडवी झाली, अनेक शेतकऱ्याचं शेती खरडून गेली. अनेकांच्या घरात पाणी शिरलं. अनेक शालेय विद्यार्थ्यांचं देखील नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे जनावरांचा मृत्यू झाला, अनेक शेतकऱ्यांचा देखील मृत्यू झाला. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठीDevendra Fadnavis Announce Packet 31 Thousand 628 Crore for Farmers यात कोणकोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे? ते बघूया.

    देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    राज्यात अनेकठिकाणी अतिवृष्टी झाली असून, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अनेकांचा मृत्यू झाला. आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहणी केली, अनेकांना दिलासा दिला. १० हजारांची तातडीने मदत देणं असेल, जिवनावश्यक वस्तू म्हणजे गहू, तांदूळ अशा वस्तू दिल्या. शेतकऱ्याचं आपल्या पिकांवर प्रेम असतं. आम्ही जेव्हा पाहणी केली तेव्हा, झोपलेलं पीक पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली. जमिनीत आता रब्बी पीकं घेण्याची क्षमता देखील उरली नाही. यातून आर्थिक आणि मानसिक त्रास झाला. भविष्यात शेतकरी आणि शेती उभी राहिली पाहिजे, म्हणून त्यामुळे आम्ही कॉम्पेन्सेशन म्हणून एक पॅकेच तयार केलं आहे.
    Maharashtra Timesफडणवीसांचे 368 दिवसांचे कष्ट वाया; रामदास भाईंकडून भाजपच्या मेहनतीवर पाणी; ठाकरेंना थेट फुलटॉस

    राज्यात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी 3 लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे, जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

    पीक नुकसानभरपाई

    शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आलं पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये.

    हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई प्रति हेक्टरी 27 हजार रुपये.

    बागायती शेती नुकसान भरपाई प्रति हेक्टरी 32 हजार रुपये.

    विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये.

    बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना 50 हजारांहून अधिक मदत मिळेल.

    Maharashtra TimesNagpur Accident Video : ट्यूशनहून परतताना काळाचा घाला, 17 वर्षीय भाग्यश्रीचा जागीच मृत्यू, CCTV फूटेज समोर

    जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी

    दुधाळ जनावरांना प्रति जनावर 37 हजार रुपयांपर्यंत मदत.

    गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार.

    कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी.

    झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजारांची मदत करणार.

    विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफ करणार.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा