Devendra Fadnavis Announce Packet 31 Thousand 628 Crore for Farmers : यंदाच्या पावसाता ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि घराचं नुकसान झालं आहे. त्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर केली आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, ते बघून घेऊया.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्यात अनेकठिकाणी अतिवृष्टी झाली असून, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अनेकांचा मृत्यू झाला. आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहणी केली, अनेकांना दिलासा दिला. १० हजारांची तातडीने मदत देणं असेल, जिवनावश्यक वस्तू म्हणजे गहू, तांदूळ अशा वस्तू दिल्या. शेतकऱ्याचं आपल्या पिकांवर प्रेम असतं. आम्ही जेव्हा पाहणी केली तेव्हा, झोपलेलं पीक पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली. जमिनीत आता रब्बी पीकं घेण्याची क्षमता देखील उरली नाही. यातून आर्थिक आणि मानसिक त्रास झाला. भविष्यात शेतकरी आणि शेती उभी राहिली पाहिजे, म्हणून त्यामुळे आम्ही कॉम्पेन्सेशन म्हणून एक पॅकेच तयार केलं आहे.
फडणवीसांचे 368 दिवसांचे कष्ट वाया; रामदास भाईंकडून भाजपच्या मेहनतीवर पाणी; ठाकरेंना थेट फुलटॉस
राज्यात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी 3 लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे, जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पीक नुकसानभरपाई
शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आलं पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये.
हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई प्रति हेक्टरी 27 हजार रुपये.
बागायती शेती नुकसान भरपाई प्रति हेक्टरी 32 हजार रुपये.
विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये.
बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना 50 हजारांहून अधिक मदत मिळेल.
Nagpur Accident Video : ट्यूशनहून परतताना काळाचा घाला, 17 वर्षीय भाग्यश्रीचा जागीच मृत्यू, CCTV फूटेज समोर
जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी
दुधाळ जनावरांना प्रति जनावर 37 हजार रुपयांपर्यंत मदत.
गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार.
कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी.
झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजारांची मदत करणार.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफ करणार.

