• Wed. Jun 10th, 2026

    Jyoti Kadam : ‘मी तर जेवण बनवत होते, पण…’; 1993 ला काय घडलेलं? रामदास कदम यांच्या पत्नीनेच सांगितला सविस्तर घटनाक्रम

    Jyoti Kadam : ‘मी तर जेवण बनवत होते, पण…’; 1993 ला काय घडलेलं? रामदास कदम यांच्या पत्नीनेच सांगितला सविस्तर घटनाक्रम

    Ramdas Kadam Wife Jyoti kadam Press Conference : अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांच्या १९९३ मधील भाजल्याच्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पत्नी भाजल्या होत्य काही त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता? असा सवाल ठाकरे सेनेचे नेते अनिल परब यांनी केला होता. यावर आता स्वत: ज्योती कदम यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, मुंबई : यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याचा सनसनाटी आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी हे सगळे आरोप फेटाळले होते. रामदास कदम यांच्या पत्नी 1993 साली ज्योती कदम या नेमक्या कशामुळे भाजल्या होत्या? याची चौकशी व्हावी अशी मागणीही अनिल परब यांनी केली होती. यावर बोलताना रामदास कदम यांनी परब यांच्या विरोधात मी व माझी पत्नी कोर्टामध्ये जाणार असल्याचा इशारा दिला होता. अशातच रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याबद्दल माहिती दिली आहे.

    ज्योती कदम म्हणाल्या की, स्टोव्हजवळ काम करताना माझा पदर जळाला होता, मी उभी असताना माझा पदर त्या स्टोव्ह वरती पडला, मी सावरताना स्टोव्ह उडाला व त्याचा स्फोट झाला आणि त्याच्यात हे मी भाजले, असे स्पष्टीकरण ज्योती कदम यांनी दिले. पत्रकार परिषद घेत सविस्तरपणे यासंदर्भात सांगितलं.
    Maharashtra TimesRamdas Kadam: आठ हजार रहिवाशांना धमकावून घरे रिकामी केली; कदमांचा परब यांच्यावर नवा आरोप
    1993 साली जो काही अक्सिडेंट झाला तो स्टोव्हमुळे झाला. मीडियामध्ये आता येत आहे की आमदारच्या घरी स्टोव्ह कसा असू शकतो? पण त्यावेळी स्टोव्ह होते, गॅस पण होता स्टोव्हवरती पण महिला काम करायच्या. आमची त्यावेळी इतकी परिस्थिती पण नव्हती, आम्ही करवंट्या जाळूनही जेवण केले आहे, अशी प्रतिक्रिया ज्योती कदम यांनी दिली आहे. आमच्या कुटुंबावर साहेबांवर केलेला आरोप फार चुकीचा आणि बदनामी करणारा असल्याचं ज्योती कदम यांनी म्हटलं आहे.
    Maharashtra TimesRamdas kadam : पत्नीने खरंच जाळून घेतलेलं का? 1993 ला काय घडलेलं? रामदास कदमांनी सर्व सांगितलं, ‘बाळासाहेब स्वत: …’

    रामदास कदम काय म्हणाले?

    तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण करण्यासाठी कुटुंबावर आरोप केले आहेत. या सगळ्या विरोधात मी व माझी पत्नी न्यायालयात जाणार असून अनिल परब याने आमची नाहक बदनामी केली आहे. खरंतर अनिल परब यांचीच नार्को टेस्ट केली पाहिजे की त्याने मर्सिडीज बिल्डर कडून घेतल्यात की नाही? कोट्यवधी रुपये त्या प्रेमनगरच्या एसआरए प्रकल्पात घेतलेत की नाही ? असं थेट आरोप परत अनिल परब याची माझ्यावर बोलण्याची औकात आहे का? अशा एकेरी भाषेत रामदास कदम यांनी अनिल परब यांना सुनावले आहे. यावरून आता अनिल परब यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा