Ramdas Kadam Wife Jyoti kadam Press Conference : अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांच्या १९९३ मधील भाजल्याच्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पत्नी भाजल्या होत्य काही त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता? असा सवाल ठाकरे सेनेचे नेते अनिल परब यांनी केला होता. यावर आता स्वत: ज्योती कदम यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.
ज्योती कदम म्हणाल्या की, स्टोव्हजवळ काम करताना माझा पदर जळाला होता, मी उभी असताना माझा पदर त्या स्टोव्ह वरती पडला, मी सावरताना स्टोव्ह उडाला व त्याचा स्फोट झाला आणि त्याच्यात हे मी भाजले, असे स्पष्टीकरण ज्योती कदम यांनी दिले. पत्रकार परिषद घेत सविस्तरपणे यासंदर्भात सांगितलं.
Ramdas Kadam: आठ हजार रहिवाशांना धमकावून घरे रिकामी केली; कदमांचा परब यांच्यावर नवा आरोप
1993 साली जो काही अक्सिडेंट झाला तो स्टोव्हमुळे झाला. मीडियामध्ये आता येत आहे की आमदारच्या घरी स्टोव्ह कसा असू शकतो? पण त्यावेळी स्टोव्ह होते, गॅस पण होता स्टोव्हवरती पण महिला काम करायच्या. आमची त्यावेळी इतकी परिस्थिती पण नव्हती, आम्ही करवंट्या जाळूनही जेवण केले आहे, अशी प्रतिक्रिया ज्योती कदम यांनी दिली आहे. आमच्या कुटुंबावर साहेबांवर केलेला आरोप फार चुकीचा आणि बदनामी करणारा असल्याचं ज्योती कदम यांनी म्हटलं आहे.
Ramdas kadam : पत्नीने खरंच जाळून घेतलेलं का? 1993 ला काय घडलेलं? रामदास कदमांनी सर्व सांगितलं, ‘बाळासाहेब स्वत: …’
रामदास कदम काय म्हणाले?
तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण करण्यासाठी कुटुंबावर आरोप केले आहेत. या सगळ्या विरोधात मी व माझी पत्नी न्यायालयात जाणार असून अनिल परब याने आमची नाहक बदनामी केली आहे. खरंतर अनिल परब यांचीच नार्को टेस्ट केली पाहिजे की त्याने मर्सिडीज बिल्डर कडून घेतल्यात की नाही? कोट्यवधी रुपये त्या प्रेमनगरच्या एसआरए प्रकल्पात घेतलेत की नाही ? असं थेट आरोप परत अनिल परब याची माझ्यावर बोलण्याची औकात आहे का? अशा एकेरी भाषेत रामदास कदम यांनी अनिल परब यांना सुनावले आहे. यावरून आता अनिल परब यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

