Security Guard stabbed with knife: नवी मुंबईतील उलवे येथे गरबा खेळून उशिरा सोसायटीत परतण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका सिक्युरिटी गार्डची चाकूने हत्या करण्यात आली.
ही घटना वैकुंठ प्राईड सोसायटीत शुक्रवारी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत सिक्युरिटी गार्ड उदय केहरी साउद (वय 26) हा मूळ नेपाळचा नागरिक होता. दरम्यान, मुख्य आरोपी ऋषिकेश रामदास राजाणे (वय 28) हा नवी मुंबईतील रहिवासी असून, तो एस्टेट एजंट म्हणून काम करतो. त्याच्यासोबतचा साथीदार सूरज रतनलाल जैसवाल (वय 25) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बीडमध्ये ‘अजब प्रेमाची, गजब कहाणी’; आधी अत्याचाराचे आरोप, नंतर त्याच API सोबत कारमध्ये गुलूगुलू; नवऱ्यानं रंगेहाथ पकडलं अन्…
सेक्युरिटी गार्डसोबत वारंवार वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी राजाणे नवरात्रीच्या काळात रोज रात्री गरबा खेळण्यासाठी बाहेर जायचा आणि उशिरा सोसायटीत परतायचा. त्यामुळे गेट बंद असणे, उशीराने उघडणे यावरून अनेकदा सिक्युरिटी गार्ड आणि त्याच्यामध्ये वाद व्हायचे. शुक्रवारी रात्री पुन्हा असाच वाद झाला आणि त्याने हिंसक रूप घेतले.
केला कुलूपाने हल्ला
वादादरम्यान उदय साउदने संतापाच्या भरात कथितपणे कुलूपाने आरोपीच्या डोक्यावर वार केला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने उदय साउदच्या पोटावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत उदयचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वार झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
सोसायटीतील रहिवाशांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर उलवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून आरोपीची ओळख पटवण्यात आली. उलवे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी ऋषिकेश रजाणे आणि त्याचा साथीदार सूरज जैसवाल यांना पनवेल परिसरातून ताब्यात घेतले.
गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावर भाष्य, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
सहाय्यक पोलिस एसीपी किशोर गायके यांनी सांगितले, “गरबा खेळून उशिरा आल्यानंतर गार्डने गेट उघडायला उशीर केला, यावरून वाद झाला. या वादात आरोपीने चाकूने साउदवर वार केला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. साक्षीदारांच्या जबाबावर आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना पकडण्यात यश आले.” या प्रकरणी उलवे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

